शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पीएच.डी.साठी ठरला लॉकडाऊन सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST

विद्यापीठ : सात महिन्यांत दोनशेहून अधिक विद्यार्थी ठरले संशोधक औरंगाबाद : लॉकडाऊन काळात देशभरातील अर्थ, उद्योग, शिक्षण असे सर्वच ...

विद्यापीठ : सात महिन्यांत दोनशेहून अधिक विद्यार्थी ठरले संशोधक

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात देशभरातील अर्थ, उद्योग, शिक्षण असे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले. असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातील सात महिन्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याची बाब समोर आली आहे.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी, लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र, दरम्यानच्या काळात अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण करून अंतिम शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. मात्र, बाहेरील विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमधील संबंधित विषयांचे तज्ज्ञ संशोधक विद्यार्थ्यांच्या मुलाखती (व्हायवा) घेण्यासाठी लॉकडाऊनमुळे औरंगाबादेत येऊ शकत नव्हते. त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठस्तरावर एक अध्यादेश जारी करुन संशोधक विद्यार्थ्यांची ‘ऑनलाईन व्हायवा’ घेण्याची प्रक्रिया सुरू केली. साधारणपणे जूनपासून ऑनलाईन मुलाखत घेण्याची जबाबदारी विभागप्रमुखांऐवजी अधिष्ठातांकडे सोपविण्यात आली.

असे बोलले जाते की, अनेकदा ‘ऑनलाईन व्हायवा’ मध्ये संबंधित विषय अथवा विभागांचे शिक्षक किंवा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होत नव्हते. त्यामुळे संशोधनातील बारकाव्याविषयी कोंडीत पकडण्याचे फारसे प्रयत्नही झाले नाहीत. परिणामी, ‘व्हायवा’ देणाऱ्यांपैकी एकाही संशोधक विद्यार्थ्याचा शोधप्रबंध नाकारुन तो पुन्हा नव्याने संशोधन करण्याची वेळ आली नाही. दोनशेहून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी पीएच. डी. प्राप्त केली. लॉकडाऊनचा काळ हा पीएच.डी. पदवी घेण्यासाठी सुकाळ ठरला, असेही थट्टेने विद्यापीठ वर्तुळात बोलले जात आहे.

चौकट...

आता ‘व्हायवा’ची जबाबदारी विभागप्रमुखांवर

विद्यापीठाच्या खास सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लाॅकडाऊनमध्ये पीएच.डी.चा ‘व्हायवा’ घेण्याची जबाबदारी अधिष्ठातांवर सोपविण्यात आली होती. मात्र, अलीकडेच एका अधिष्ठाताने संशोधक विद्यार्थ्याला अरेरावीची भाषा वापरल्यामुळे त्या उद्विग्न झालेल्या विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे तक्रार केली. त्यामुळे अधिष्ठातांकडे ‘व्हायवा’ची दिलेली जबाबदारी पूर्वीप्रमाणे विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. तसेही अधिष्ठातांकडे प्रवेशप्रक्रियेपासून परीक्षेपर्यंतच्या कामाचा भार असतो. त्यामुळे ‘व्हायवा’च्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येते.