शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’

By admin | Updated: March 18, 2017 23:22 IST

किल्लारी दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सूर्यकांत बाळापुरे किल्लारीदोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील जवळपास ५० एकरवरील विदेशात निर्यात होणारी द्राक्ष आता लोकलच्या बाजारात विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना सर्वात मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औसा तालुक्यातून द्राक्षांची सर्वाधिक दरवर्षी निर्यात होते. गेल्या तीन वर्षांत दुष्काळामुळे तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. या संकटातून काही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देऊन मार्ग काढीत द्राक्ष बागा जगविल्या. सध्या द्राक्षांची काढणी सुरू असून, निर्यातही सुरू आहे. दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी औसा तालुक्यात गारांचा पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील किल्लारीसह मंगरुळ, नांदुर्गा, येल्लोरी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांमुळे द्राक्षांच्या घडांचे मणी नरम पडून गळाले आहेत. त्याचबरोबर द्राक्षांच्या मण्यांवरील शायनिंगही उडाली आहे. काही बागांमध्ये मण्यांवर रेषा पडून डाग पडले आहेत. त्यामुळे ही द्राक्षे आता बागायतदारांना स्थानिक पातळीवरील बाजारातच विक्री करावी लागणार आहे.गारांमुळे किल्लारी परिसरातील विनोद बाभळसुरे, विश्वजित पाटील यांच्या प्रत्येकी दोन एकर, बस्वराज बिराजदार, बाबुराव वाडीकर यांच्या प्रत्येकी अडीच एकर तर पांडुरंग चेळकर यांच्या तीन एकर बागेचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील मंगरुळ, नांदुर्गा, येल्लोरी येथील द्राक्ष बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हे बागायतदार आता चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांकडून केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत पाण्याअभावी तर यंदा गारपिटीमुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.