शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:03 IST

औरंगाबाद : ओबीसी आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता कामा नये असे ऑल इंडिया मुस्लीम ...

औरंगाबाद : ओबीसी आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता कामा नये असे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत बजावले.

त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात राज्य सरकारने हलगर्जीपणा करून १५ महिन्यांत काहीच केले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २७ टक्के मिळणारे आरक्षण गमावले गेले. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने लवकर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून आपली बाजू न्यायालयात मांडावी. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नये. आरक्षणाचा निर्णय सरकारने लवकर घेतला नाही तर संघटना राज्यात येत्या पंधरा दिवसांत मोठे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

त्यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यांहून जास्त गेल्याचे निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देऊनही सरकारने आपली बाजू मांडली नसल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. दुर्बल घटकातील ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही संधी होती. ती आता नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. भाजपा आणि काँग्रेसवरही त्यांनी यावेळी टीका केली. यावेळी गजनफर जावेद, महेबूब खान, अब्दुल कय्यूम नदवी यांची उपस्थिती होती.