शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्जमाफीचे ३४५९२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:16 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.जिल्ह्यात सन २०१६ चे ६५ हजार तर २०१७ चे ७८ हजार असे एकूण १ लाख ४३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. विशेष म्हणजे थकबाकीदार कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी ही योजना लागू होणार आहे. योजनेतून दीड लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. १५ पानी असलेल्या कर्जमाफीच्या अर्जातील अटीशर्ती पूर्ण करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. तसेच योजनेच्या नावानेच असलेली वेबसाईट सर्वत्र खुली असल्याने संथगतीने चालत असल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत. केंद्रावर एक- एक अर्ज भरण्यासाठी जवळपास ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागत आहेत. कधी-कधी तर वेबसाईटच सुरु होत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यातच शेतकºयांचा संपूर्ण दिवस जात आहे.नोंदणी व अर्ज भरण्यासाठी संपूर्ण महाराष्टÑात एकच वेबसाईट असल्यानेही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री केंद्रावर शेतकरी तळ ठोकून राहत आहेत. अर्ज भरण्यासाठी प्रथम शेतकºयांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालीच तर शेतकरी अर्ज भरुन शकतो. विशेष म्हणजे मोबाईलवरही अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आधार लिंक असलेले शेतकरी मोबाईलवरही अर्ज भरु शकतात.आधार लिंक नसणाºयांना मात्र केंद्रावर जाण्याशिवाय पर्याय नाही. या आठवड्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. ती अजूनही कायम आहे.