शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कर्जमाफीचे ३४५९२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:16 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.जिल्ह्यात सन २०१६ चे ६५ हजार तर २०१७ चे ७८ हजार असे एकूण १ लाख ४३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. विशेष म्हणजे थकबाकीदार कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी ही योजना लागू होणार आहे. योजनेतून दीड लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. १५ पानी असलेल्या कर्जमाफीच्या अर्जातील अटीशर्ती पूर्ण करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. तसेच योजनेच्या नावानेच असलेली वेबसाईट सर्वत्र खुली असल्याने संथगतीने चालत असल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत. केंद्रावर एक- एक अर्ज भरण्यासाठी जवळपास ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागत आहेत. कधी-कधी तर वेबसाईटच सुरु होत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यातच शेतकºयांचा संपूर्ण दिवस जात आहे.नोंदणी व अर्ज भरण्यासाठी संपूर्ण महाराष्टÑात एकच वेबसाईट असल्यानेही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री केंद्रावर शेतकरी तळ ठोकून राहत आहेत. अर्ज भरण्यासाठी प्रथम शेतकºयांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालीच तर शेतकरी अर्ज भरुन शकतो. विशेष म्हणजे मोबाईलवरही अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आधार लिंक असलेले शेतकरी मोबाईलवरही अर्ज भरु शकतात.आधार लिंक नसणाºयांना मात्र केंद्रावर जाण्याशिवाय पर्याय नाही. या आठवड्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. ती अजूनही कायम आहे.