शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

२८ कर्मचाऱ्यांवर भार

By admin | Updated: July 10, 2014 01:02 IST

गंगाराम आढाव , जालना शहर वाहतूक पोलिस शाखेस साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे सक्षम होईनाशी झाली आहे.

गंगाराम आढाव , जालनाशहर वाहतूक पोलिस शाखेस गेल्या साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे वाहतूक शाखा सक्षम होईनाशी झाली आहे. पूर्वी प्रमाणेच या यंत्रणेचे दैनंदिन कामकाज पूर्णत: कोलमडलेले आहे. शाखा सक्षम बनवावी व रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शहरासह जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून गृहखात्याने शहर वाहतूक पोलिस यंत्रणेस जिल्हा शाखेचा दर्जा बहाल केला. साडेतीन ते चार वर्षांपूर्वी या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. पाठोपाठ कारवाई केली. परिणामी शहर वाहतूक शाखेस जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा बहाल झाला. दुर्दैवाने या शाखेचा दर्जा वाढवून सुद्धा या यंत्रणेच्या कामकाजात काडीचीही सुधारणा झाली नाही. गेल्या साडेतीन चार वर्षांपासून शहरासह जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांची अपुरी संख्याच त्यास कारणीभूत आहे. वास्तविकता या शाखेद्वारे जिल्हा शाखेचा दर्जा मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजात सुधारणा होईल असे अपेक्षित होते, दुर्दैवाने यंत्रणेत अधिकारी कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे रिक्त आहेत. त्यामुळेच या यंत्रणेंतर्गत आहे त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवरच शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा मोठा बोजा आहे. त्यामुळेच वाहतूक यंत्रणा सुरळीत होईनासी अशी झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग जातात. औरंगाबाद ते जालना पुढे जिंतूर या राज्यमार्गासह जाफराबाद, भोकरदन ते जालना, जालना ते अंबड, पुढे शहागड - बीड, भोकरदन ते सिल्लोड पुढे जळगाव तसेच अन्य महत्त्वपूर्ण मार्गावरुन वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. दुर्दैवाने त्या तुलनेत शहरांतर्गत तसेच जिल्ह्यातील वाहतुकीस कोणतीही शिस्त नाही. हे वास्तव आहे. त्यामुळेच रस्ते वाहतूक सुरळीत होण्याकरिता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती गरजेची आहे. नूतन पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी वाहतूक यंत्रणेस सर्वार्थाने सक्षम बनावे म्हणून सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.१०० पोलिसांची आवश्यकतायेथील जिल्हा वाहतूक शाखेत ६८ पदे मंजूर आहेत. पोलिस निरीक्षकांचे एक पद भरलेले आहे. फौजदारासह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे भरल्या जावीत म्हणून पोलिस यंत्रणेकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शहरातील गांधी चमन, शिवाजी पुतळा, मंठा चौफुली, पाणीवेस, सराफा बाजार, कॉलेज रोड, कडबी मंडी, विशाल कॉर्नर आदी भागात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून २८ बीट आहेत. एका बीटमध्ये दोन कर्मचारी अपेक्षित आहे. परंतु या २८ बीटचे कामकाज पाहण्याकरिता ५६ कर्मचाऱ्यांची गरज आहे. दर आठवड्यास रजा व सुट्यांमुळेच बीटकडे लक्ष देणे शक्त होत नाही. अपुरा कर्मचारी वर्ग असताना सुद्धा एक जानेवारी ते ३० जून या दरम्यान, सात हजार केसेस केल्या. त्याद्वारे २० लाख रुपयांचा दंड वसूल केला. या व्यतिरिक्त सावरकर चौक, बाजार चौक, फूलबाजार, सराफा आदी ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहिमेत सहभाग नोंदविला.