शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२८ कर्मचाऱ्यांवर भार

By admin | Updated: July 10, 2014 01:02 IST

गंगाराम आढाव , जालना शहर वाहतूक पोलिस शाखेस साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे सक्षम होईनाशी झाली आहे.

गंगाराम आढाव , जालनाशहर वाहतूक पोलिस शाखेस गेल्या साडेतीन-चार वर्षापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा मिळाला खरा. परंतु अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी रिक्त पदांमुळे वाहतूक शाखा सक्षम होईनाशी झाली आहे. पूर्वी प्रमाणेच या यंत्रणेचे दैनंदिन कामकाज पूर्णत: कोलमडलेले आहे. शाखा सक्षम बनवावी व रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शहरासह जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून गृहखात्याने शहर वाहतूक पोलिस यंत्रणेस जिल्हा शाखेचा दर्जा बहाल केला. साडेतीन ते चार वर्षांपूर्वी या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. पाठोपाठ कारवाई केली. परिणामी शहर वाहतूक शाखेस जिल्हा वाहतूक शाखेचा दर्जा बहाल झाला. दुर्दैवाने या शाखेचा दर्जा वाढवून सुद्धा या यंत्रणेच्या कामकाजात काडीचीही सुधारणा झाली नाही. गेल्या साडेतीन चार वर्षांपासून शहरासह जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांची अपुरी संख्याच त्यास कारणीभूत आहे. वास्तविकता या शाखेद्वारे जिल्हा शाखेचा दर्जा मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजात सुधारणा होईल असे अपेक्षित होते, दुर्दैवाने यंत्रणेत अधिकारी कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे रिक्त आहेत. त्यामुळेच या यंत्रणेंतर्गत आहे त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवरच शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा मोठा बोजा आहे. त्यामुळेच वाहतूक यंत्रणा सुरळीत होईनासी अशी झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग जातात. औरंगाबाद ते जालना पुढे जिंतूर या राज्यमार्गासह जाफराबाद, भोकरदन ते जालना, जालना ते अंबड, पुढे शहागड - बीड, भोकरदन ते सिल्लोड पुढे जळगाव तसेच अन्य महत्त्वपूर्ण मार्गावरुन वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. दुर्दैवाने त्या तुलनेत शहरांतर्गत तसेच जिल्ह्यातील वाहतुकीस कोणतीही शिस्त नाही. हे वास्तव आहे. त्यामुळेच रस्ते वाहतूक सुरळीत होण्याकरिता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती गरजेची आहे. नूतन पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी वाहतूक यंत्रणेस सर्वार्थाने सक्षम बनावे म्हणून सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.१०० पोलिसांची आवश्यकतायेथील जिल्हा वाहतूक शाखेत ६८ पदे मंजूर आहेत. पोलिस निरीक्षकांचे एक पद भरलेले आहे. फौजदारासह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे भरल्या जावीत म्हणून पोलिस यंत्रणेकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शहरातील गांधी चमन, शिवाजी पुतळा, मंठा चौफुली, पाणीवेस, सराफा बाजार, कॉलेज रोड, कडबी मंडी, विशाल कॉर्नर आदी भागात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून २८ बीट आहेत. एका बीटमध्ये दोन कर्मचारी अपेक्षित आहे. परंतु या २८ बीटचे कामकाज पाहण्याकरिता ५६ कर्मचाऱ्यांची गरज आहे. दर आठवड्यास रजा व सुट्यांमुळेच बीटकडे लक्ष देणे शक्त होत नाही. अपुरा कर्मचारी वर्ग असताना सुद्धा एक जानेवारी ते ३० जून या दरम्यान, सात हजार केसेस केल्या. त्याद्वारे २० लाख रुपयांचा दंड वसूल केला. या व्यतिरिक्त सावरकर चौक, बाजार चौक, फूलबाजार, सराफा आदी ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहिमेत सहभाग नोंदविला.