शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

मार्चनंतर लोडशेडिंगचे चटके

By admin | Updated: March 1, 2016 00:34 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद शहर भारनियमनमुक्त करण्यात आलेले आहे. असे असले तरी विविध उपाययोजना केल्यानंतरही वीज गळती (लाईन लॉसेस) कमी होत नाही.

बापू सोळुंके , औरंगाबादशहर भारनियमनमुक्त करण्यात आलेले आहे. असे असले तरी विविध उपाययोजना केल्यानंतरही वीज गळती (लाईन लॉसेस) कमी होत नाही. जुन्या शहरातील ४० टक्के फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ६० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस वीज बिलाची थकबाकीही वाढत असून, वसुली पथकावर हल्ले होत असल्याने महावितरणचे अधिकारी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून मार्चनंतर शहरात लोडशेडिंगची शिफारस केली जाणार असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली. यामुळे औरंगाबादकरांचा उन्हाळा असह्य उकाड्यात जाण्याची भीती आहे.शहरात महावितरणचे २ लाख ६० हजार ९१८ वीज ग्राहक आहेत. यापैकी जुन्या शहराचा भाग असलेल्या विभाग क्रमांक-१ मध्ये १ लाख २२ हजार २४५ तर सिडको, हडको, चिकलठाणा, गारखेडा परिसराचा समावेश असलेल्या विभाग क्रमांक-२ मध्ये १ लाख ३८ हजार ६७३ वीज ग्राहक आहेत. विभाग क्रमांक-१ मध्ये ५० फिडर असून, यापैकी निम्म्या २४ फिडरवर सर्वाधिक वीजचोरी आहे. या फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून सतत विशेष मोहिमा या विभागात राबविण्यात येतात. त्यानंतरही वीज चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. वीजचोरीसोबतच बिल वसुलीही अत्यल्प आहे. या विभागातील अडीच हजार ग्राहकांकडे तब्बल ५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच औरंगाबाद शहर विभाग क्रमांक-२ मधील वीज गळती असलेल्या फिडरची संख्या १० पेक्षा अधिक आहे. असे असले तरी या विभागातील वीज बिलांची थकबाकी मात्र, कमी होत नाही. शहरातील एकूण ८६ पैकी ३२ फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत आहे. ज्या भागात वीजचोरी अधिक आहे, त्या वसाहतीत प्लास्टिक कोटेड वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. काही भागात तर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या. त्यावर सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च केल्यानंतरही वीजचोरी थांबत नाही आणि थकबाकीही वसूल होत नसल्याने भारनियमनाचा पर्याय महावितरणसमोर राहिला आहे.महावितरणने वीज गळतीच्या प्रमाणावरून लोडशेडिंगचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार औरंगाबादशिवाय अन्य ठिकाणी लोडशेडिंग केली जात आहे. त्यासाठी ई, एफ, जी १, जी २, अशी वर्गवारी केली आहे. ४४२ टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत वीज गळती असलेल्या फिडरला ई गट म्हणून संबोधले जाते. त्या फिडरवर सव्वासहा तास लोडशेडिंग केले जाते. ५० ते ५८ टक्के वीज गळती असलेल्या फिडरचा समावेश एफ गटात आहे. याविषयी मुख्य अभियंता सतीश चव्हाण म्हणाले की, शहरातील अनेक फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि वसुलीही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही सध्या वीज बिल वसुली आणि वीज गळती रोखण्यास प्राधान्य दिलेले आहे. प्रयत्न करूनही वीज गळती कमी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे लोडशेडिंगच्या पर्यायांचा विचार मार्चनंतर होऊ शकतो. शिवाय आम्ही अन्य पर्यायांचाही विचार करीत आहोत.