शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मार्चनंतर लोडशेडिंगचे चटके

By admin | Updated: March 1, 2016 00:34 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद शहर भारनियमनमुक्त करण्यात आलेले आहे. असे असले तरी विविध उपाययोजना केल्यानंतरही वीज गळती (लाईन लॉसेस) कमी होत नाही.

बापू सोळुंके , औरंगाबादशहर भारनियमनमुक्त करण्यात आलेले आहे. असे असले तरी विविध उपाययोजना केल्यानंतरही वीज गळती (लाईन लॉसेस) कमी होत नाही. जुन्या शहरातील ४० टक्के फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ६० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस वीज बिलाची थकबाकीही वाढत असून, वसुली पथकावर हल्ले होत असल्याने महावितरणचे अधिकारी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून मार्चनंतर शहरात लोडशेडिंगची शिफारस केली जाणार असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली. यामुळे औरंगाबादकरांचा उन्हाळा असह्य उकाड्यात जाण्याची भीती आहे.शहरात महावितरणचे २ लाख ६० हजार ९१८ वीज ग्राहक आहेत. यापैकी जुन्या शहराचा भाग असलेल्या विभाग क्रमांक-१ मध्ये १ लाख २२ हजार २४५ तर सिडको, हडको, चिकलठाणा, गारखेडा परिसराचा समावेश असलेल्या विभाग क्रमांक-२ मध्ये १ लाख ३८ हजार ६७३ वीज ग्राहक आहेत. विभाग क्रमांक-१ मध्ये ५० फिडर असून, यापैकी निम्म्या २४ फिडरवर सर्वाधिक वीजचोरी आहे. या फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून सतत विशेष मोहिमा या विभागात राबविण्यात येतात. त्यानंतरही वीज चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. वीजचोरीसोबतच बिल वसुलीही अत्यल्प आहे. या विभागातील अडीच हजार ग्राहकांकडे तब्बल ५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच औरंगाबाद शहर विभाग क्रमांक-२ मधील वीज गळती असलेल्या फिडरची संख्या १० पेक्षा अधिक आहे. असे असले तरी या विभागातील वीज बिलांची थकबाकी मात्र, कमी होत नाही. शहरातील एकूण ८६ पैकी ३२ फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत आहे. ज्या भागात वीजचोरी अधिक आहे, त्या वसाहतीत प्लास्टिक कोटेड वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. काही भागात तर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या. त्यावर सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च केल्यानंतरही वीजचोरी थांबत नाही आणि थकबाकीही वसूल होत नसल्याने भारनियमनाचा पर्याय महावितरणसमोर राहिला आहे.महावितरणने वीज गळतीच्या प्रमाणावरून लोडशेडिंगचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार औरंगाबादशिवाय अन्य ठिकाणी लोडशेडिंग केली जात आहे. त्यासाठी ई, एफ, जी १, जी २, अशी वर्गवारी केली आहे. ४४२ टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत वीज गळती असलेल्या फिडरला ई गट म्हणून संबोधले जाते. त्या फिडरवर सव्वासहा तास लोडशेडिंग केले जाते. ५० ते ५८ टक्के वीज गळती असलेल्या फिडरचा समावेश एफ गटात आहे. याविषयी मुख्य अभियंता सतीश चव्हाण म्हणाले की, शहरातील अनेक फिडरवरील वीज गळतीचे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि वसुलीही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही सध्या वीज बिल वसुली आणि वीज गळती रोखण्यास प्राधान्य दिलेले आहे. प्रयत्न करूनही वीज गळती कमी होत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे लोडशेडिंगच्या पर्यायांचा विचार मार्चनंतर होऊ शकतो. शिवाय आम्ही अन्य पर्यायांचाही विचार करीत आहोत.