शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

पशुधनास चारा छावण्यांचा आधार

By admin | Updated: August 21, 2015 00:44 IST

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला. यामुळे जिल्ह्यातील आठ लाख पशुधनास मोठा आधार निर्माण झाला आहे.पावसाने दडी मारल्यानंतर जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले होते. ही संधी असल्याचे काही जणांनी मानत कडबा दुपटीने विक्री करण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी कडब्याचे दर १४०० रूपये शेकडा होते तर त्यानंतरच्या १५ दिवसांच्या कालावधीत हे दर जवळपास अडीच ते तीन हजारांवर जाऊन पोहोचले होते. यामुळे पशूधन वाचविणे शेतकऱ्यांना मोठे अवघड बनले होते. वाळला चारा महाग असल्यामुळे जनावरांना ओला चारा दिला जात होता. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आपला अहवाल सादर केला होता. जनावरांच्या छावणीत किमान ५०० व कमाल तीन हजार जनावरे ठेवण्यात येतील. त्यामुळे पशुपालकांना आता छावणीत मुक्काम करावा लागणार आहे.वेळोवेळीच्या परिस्थितीचे आकलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चारा छावणीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक जनावरांच्या मालकांना त्यांच्याकडे असलेल्या जास्तीत जास्त पाच जनावरांपर्यंत (लहान व मोठे) मर्यादीत असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ यांच्यासारख्या संस्थामार्फत गुरांच्या छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजपचे भाई गंगाभीषण थावरे यांनी चारा डेपो, छावण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतपुढे गुरे बांधून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ आॅगस्ट रोजी माजलगाव तहसीलने बैठक बोलावली होती. आता ही बैठक २२ रोजी होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरे आहेत. मोठ्या गुरांची संख्या ५ लाख ९६ हजार ७०७ तर लहान गुरांची संख्या २ लाख २५ हजार ६५७ एवढी आहे. या गुरांना दररोज ४२५७ मेट्रीक टन चारा आवश्यक आहे. चारा संपल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे फड गुत्ते घेऊन उसासह वाढे दावणीत टाकणे सुरू केले होते. त्यामुळे उसालाही चांगला भाव आला होता. पशुपालक मात्र मेटाकुटीला आले होते. छावण्यांनी दिलासा मिळणार आहे.