शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनास चारा छावण्यांचा आधार

By admin | Updated: August 21, 2015 00:44 IST

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला. यामुळे जिल्ह्यातील आठ लाख पशुधनास मोठा आधार निर्माण झाला आहे.पावसाने दडी मारल्यानंतर जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले होते. ही संधी असल्याचे काही जणांनी मानत कडबा दुपटीने विक्री करण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी कडब्याचे दर १४०० रूपये शेकडा होते तर त्यानंतरच्या १५ दिवसांच्या कालावधीत हे दर जवळपास अडीच ते तीन हजारांवर जाऊन पोहोचले होते. यामुळे पशूधन वाचविणे शेतकऱ्यांना मोठे अवघड बनले होते. वाळला चारा महाग असल्यामुळे जनावरांना ओला चारा दिला जात होता. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आपला अहवाल सादर केला होता. जनावरांच्या छावणीत किमान ५०० व कमाल तीन हजार जनावरे ठेवण्यात येतील. त्यामुळे पशुपालकांना आता छावणीत मुक्काम करावा लागणार आहे.वेळोवेळीच्या परिस्थितीचे आकलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चारा छावणीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक जनावरांच्या मालकांना त्यांच्याकडे असलेल्या जास्तीत जास्त पाच जनावरांपर्यंत (लहान व मोठे) मर्यादीत असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ यांच्यासारख्या संस्थामार्फत गुरांच्या छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजपचे भाई गंगाभीषण थावरे यांनी चारा डेपो, छावण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतपुढे गुरे बांधून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ आॅगस्ट रोजी माजलगाव तहसीलने बैठक बोलावली होती. आता ही बैठक २२ रोजी होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरे आहेत. मोठ्या गुरांची संख्या ५ लाख ९६ हजार ७०७ तर लहान गुरांची संख्या २ लाख २५ हजार ६५७ एवढी आहे. या गुरांना दररोज ४२५७ मेट्रीक टन चारा आवश्यक आहे. चारा संपल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे फड गुत्ते घेऊन उसासह वाढे दावणीत टाकणे सुरू केले होते. त्यामुळे उसालाही चांगला भाव आला होता. पशुपालक मात्र मेटाकुटीला आले होते. छावण्यांनी दिलासा मिळणार आहे.