शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनास चारा छावण्यांचा आधार

By admin | Updated: August 21, 2015 00:44 IST

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला

बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला. यामुळे जिल्ह्यातील आठ लाख पशुधनास मोठा आधार निर्माण झाला आहे.पावसाने दडी मारल्यानंतर जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले होते. ही संधी असल्याचे काही जणांनी मानत कडबा दुपटीने विक्री करण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी कडब्याचे दर १४०० रूपये शेकडा होते तर त्यानंतरच्या १५ दिवसांच्या कालावधीत हे दर जवळपास अडीच ते तीन हजारांवर जाऊन पोहोचले होते. यामुळे पशूधन वाचविणे शेतकऱ्यांना मोठे अवघड बनले होते. वाळला चारा महाग असल्यामुळे जनावरांना ओला चारा दिला जात होता. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आपला अहवाल सादर केला होता. जनावरांच्या छावणीत किमान ५०० व कमाल तीन हजार जनावरे ठेवण्यात येतील. त्यामुळे पशुपालकांना आता छावणीत मुक्काम करावा लागणार आहे.वेळोवेळीच्या परिस्थितीचे आकलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चारा छावणीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक जनावरांच्या मालकांना त्यांच्याकडे असलेल्या जास्तीत जास्त पाच जनावरांपर्यंत (लहान व मोठे) मर्यादीत असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ यांच्यासारख्या संस्थामार्फत गुरांच्या छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजपचे भाई गंगाभीषण थावरे यांनी चारा डेपो, छावण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतपुढे गुरे बांधून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ आॅगस्ट रोजी माजलगाव तहसीलने बैठक बोलावली होती. आता ही बैठक २२ रोजी होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरे आहेत. मोठ्या गुरांची संख्या ५ लाख ९६ हजार ७०७ तर लहान गुरांची संख्या २ लाख २५ हजार ६५७ एवढी आहे. या गुरांना दररोज ४२५७ मेट्रीक टन चारा आवश्यक आहे. चारा संपल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे फड गुत्ते घेऊन उसासह वाढे दावणीत टाकणे सुरू केले होते. त्यामुळे उसालाही चांगला भाव आला होता. पशुपालक मात्र मेटाकुटीला आले होते. छावण्यांनी दिलासा मिळणार आहे.