शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

पावणेतीन लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:56 IST

चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसामध्ये तब्बल दीड महिन्याचा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील कपाशी पीक कोमेजले होते. मात्र, मागील चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशी लागवडीला प्राधान्य देतात. यंदा खरिपात दोन लाख ९७ हजार ९९२ हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजित होते. जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकºयांनी सुरुवातीलाच कपाशीची लागवड केली. मात्र, भोकरदन व जाफराबाद तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी शेतकºयांना कपाशीची दुसºयांदा लागवड करावी लागली. जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ८७ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कपाशी पीक फुले येण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयांनी आतापर्यंत खते, औषधी फवारणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, मूग, उडीद हे पिके वाया गेली.कपाशी पिकाची वाढही खुंटली होती. पाणी उपलब्ध असणाºया शेतकºयांची ठिबक सिंचनच्या मदतीने कपाशी पीक जगविण्यासाठी धडपड सुरू होती. तर कोरडवाहू जमीन असणाºया शेतकºयांनी कपाशी पीक येण्याची आशा सोडली होती. त्यामुळे कापसाचे उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. दरम्यान, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कोमेजू लागलेली कपाशीची झाडे टवटवीत झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे कपाशीसह अन्य तात्पुरता दिलासा मिळाला.