शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पावणेतीन लाख हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:56 IST

चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसामध्ये तब्बल दीड महिन्याचा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील कपाशी पीक कोमेजले होते. मात्र, मागील चोवीस तासांत सर्वदूर झालेल्या पावसामुळे सुमारे दोन लाख ७८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाला जीवदान मिळाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशी लागवडीला प्राधान्य देतात. यंदा खरिपात दोन लाख ९७ हजार ९९२ हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजित होते. जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकºयांनी सुरुवातीलाच कपाशीची लागवड केली. मात्र, भोकरदन व जाफराबाद तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी शेतकºयांना कपाशीची दुसºयांदा लागवड करावी लागली. जुलैपर्यंत जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ८७ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कपाशी पीक फुले येण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयांनी आतापर्यंत खते, औषधी फवारणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, मूग, उडीद हे पिके वाया गेली.कपाशी पिकाची वाढही खुंटली होती. पाणी उपलब्ध असणाºया शेतकºयांची ठिबक सिंचनच्या मदतीने कपाशी पीक जगविण्यासाठी धडपड सुरू होती. तर कोरडवाहू जमीन असणाºया शेतकºयांनी कपाशी पीक येण्याची आशा सोडली होती. त्यामुळे कापसाचे उत्पादन पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. दरम्यान, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे कोमेजू लागलेली कपाशीची झाडे टवटवीत झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे कपाशीसह अन्य तात्पुरता दिलासा मिळाला.