शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

औरंगाबाद जिल्ह्यात ३४० मुलांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:59 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे२०१३ पासून : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचे फलित

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेंतर्गत सन २०१३ पासून जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४७८ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने यापैकी ३४० मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे नवे जीवन मिळाले, तर ७८१ मुलांवर अपेंडिक्स, हार्निया, व्यंग, कान, नाक, घसा, हाडे तसेच किडनीसह अन्य प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे तसेच त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी सन २००८ पासून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. २०१३ साली या तपासणी मोहिमेचे ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ असे नामांतर झाले. या कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील बालकांची, तर एक वेळेस शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. एप्रिल २०१७ ते जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यातील २,७८० शाळांपैकी २,५८१ शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या ५ लाख १३ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी १ लाख ३४८ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले.याशिवाय जिल्ह्यातील ३,४२७ अंगणवाड्यांपैकी जानेवारीअखेरपर्यंत १,९२५ अंगणवाड्यांमधील ०-६ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ लाख २० हजार ७५ बालकांपैकी १ लाख ५० हजार ८२५ बालकांची आरोग्य तपासणी झाली. किरकोळ आजारी असलेल्या बालकांपैकी २१ हजार ५४ बालकांवर औषधोपचार करण्यात आले.चालू आर्थिक वर्षातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत ४५ मुले हृदयरोगाने त्रस्त असल्याचे निदान झाले. अधिक निदान करण्यासाठी या मुलांची टूडी इको तपासणी करण्यात आल्यानंतर ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’च्या माध्यमातून ३२ मुलांपैकी काहींच्या कमलनयन, धूत, एमजीएम हॉस्पिटलमध्ये, तर काहींच्या हृदयावर मुंबई, बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सन २०१३ पासून जानेवारी अखेरपर्यंत ४७८ हृदयरोगाने त्रस्त आढळून आलेल्या मुलांपैकी ३४० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ४ हजार ६६० विद्यार्थ्यांना संदर्भित रुग्णसेवेसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९७७ मुलांवर औषधोपचार करण्यात आले.जिल्ह्यामध्ये ४२ पथके कार्यरत; अंगणवाडी, शाळांमध्ये तपासणीयासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड म्हणाले की, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये ४२ पथके तैनात करण्यात आलेली असून, एका पथकात महिला व पुरुष, असे दोन डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक नर्स यांचा समावेश आहे. अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन ही पथके विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात.हृदयरोगाने त्रस्त मुलांचे प्रमाण हे आंतरराष्ट्रीय प्रमाणाएवढेच आहे. एक लाख बालकांमागे किमान १० बालके हृदयरोगाने आजारी असतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळून येणारे आरोग्यविषयक दोष शोधून काढणे, विद्यार्थ्यांमधील आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि गंभीर आजारी विद्यार्थ्यांना संदर्भसेवा देणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया करणे, हा या आरोग्य तपासणीचा उद्देश आहे.