शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण न करता थेट शोध

By admin | Updated: June 22, 2017 23:24 IST

हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून जोरात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करण्याची मोहीम शिक्षण विभागाकडून जोरात सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आता शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांचे आता सर्वेक्षण न करता त्यांचा शोध घेऊन त्यांना वयोगटानुसार तत्काळ शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे. परंतु शाळाबाह्य मुलांची आकडेवारी निश्चित करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शाळेत दाखल करावे लागणार आहे. शिवाय या मुलांची सरल प्रणालीमध्ये नोंद करण्यात येणार आहे. दिलेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यात १०१ शाळाबाह्य मुले आहेत, तर वसमत ५४, कळमनुरी ८१, औंढानागनाथ ५७ तसेच सर्वाधिक सेनगाव तालुक्यात ४४६ मुला-मुलींची संख्या आहे. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने सध्या शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे. एकही मुलगा शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेत या मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आवडेल असे गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून सध्या नियोजन केले जात आहे. शिवाय बैठका बोलावून संबधित यंत्रणेस मोहीम राबविण्याबाबत माहिती सांगितली जाणार आहे. शिवाय शाळेतील मुलींच्या गळतीकडे विशेष लक्ष दिले जाणार असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे.