शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

गाव-तांड्यावरील साक्षरतेचे वर्ग झाले बंद !

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़

लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे प्रेरक आर्थिक अडचणीत सापडले असून गावा- गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये रात्री भरणारे साक्षरतेचे केंद्र बंद झाले आहेत़१५ ते ६५ या वयोगटातील अशिक्षित, नवसाक्षर यांना साक्षर बनवून देशात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २००९ पासून साक्षर भारत अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ यात मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली या सात जिल्ह्यांचा समावेश आहे़ प्रत्येक गावातील १० नवसाक्षरांसाठी एक स्वयंसेवक आणि सर्व नवसाक्षरांना शिक्षण देण्यासाठी एका प्रेरकाची निवड करण्यात आली होती़जिल्ह्यातील ७८७ गावांमध्ये १५७२ प्रेरकांची निवड करण्यात येऊन त्यांना दर तीन महिन्यांच्या नियुक्त्या निरंतर शिक्षण विभाकडून देण्यात येत होत्या़ प्रेरकांना मासिक दोन हजार रुपये मानधन देण्यात येते़ दररोज सायंकाळी दोन तास हे शिक्षणाचे वर्ग प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत भरण्याच्या सूचना करण्यात आल्याने त्यानुसार वर्ग भरण्यात येऊ लागले़ तीन वर्षे हा उपक्रम राबवून त्याची पाहणी करण्यात आली असता शासनाच्या धोरणाप्रमाणे कारवाई झाली नसल्याने केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त करीत पुन्हा सन २०१७ पर्यंत या अभियानास गेल्या वर्षी मुदतवाढ दिली़गेल्या वर्षी ही मुदत वाढ देण्यात आली असली तरी केंद्र शासनाकडून प्रेरक व इतर शैक्षणिक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे गेल्या १७ महिन्यांपासून मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून प्रेरकांकडून सतत मागणी केली जात आहे़ परंतु, अद्यापही शासनाकडून मानधन मिळाले नाही़ त्यामुळे दररोज रात्री गावांत भरणारे शिक्षण केंद्र बंद पडले आहेत़ (प्रतिनिधी)सर्वे राहिला अर्धवट़़़या प्रेरकांच्या मदतीने जिल्ह्यातील कुटुंबांची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सर्वे सुरु करण्यात आला होता़ मानधनच थकित राहिल्याने प्रेरकांनी हा सर्वे अर्धवट स्थितीत सोडून दिला आहे़ त्यामुळे शिक्षण केंद्र बंद पडण्याबरोबरच सर्व्हेही अपूर्ण राहिला आहे़ प्रेरकांचे मानधनासाठी हेलपाटे सुरु आहेत़केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने प्रेरकांचे मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती निरंतर शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी एस़ एस़ येलूरकर यांनी सांगितले़