शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

गाव-तांड्यावरील साक्षरतेचे वर्ग झाले बंद !

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़

लातूर : साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साक्षर भारत अभियानातंर्गतच्या प्रेरकांचे मानधन गेल्या १७ महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे प्रेरक आर्थिक अडचणीत सापडले असून गावा- गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये रात्री भरणारे साक्षरतेचे केंद्र बंद झाले आहेत़१५ ते ६५ या वयोगटातील अशिक्षित, नवसाक्षर यांना साक्षर बनवून देशात साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २००९ पासून साक्षर भारत अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ यात मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली या सात जिल्ह्यांचा समावेश आहे़ प्रत्येक गावातील १० नवसाक्षरांसाठी एक स्वयंसेवक आणि सर्व नवसाक्षरांना शिक्षण देण्यासाठी एका प्रेरकाची निवड करण्यात आली होती़जिल्ह्यातील ७८७ गावांमध्ये १५७२ प्रेरकांची निवड करण्यात येऊन त्यांना दर तीन महिन्यांच्या नियुक्त्या निरंतर शिक्षण विभाकडून देण्यात येत होत्या़ प्रेरकांना मासिक दोन हजार रुपये मानधन देण्यात येते़ दररोज सायंकाळी दोन तास हे शिक्षणाचे वर्ग प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत भरण्याच्या सूचना करण्यात आल्याने त्यानुसार वर्ग भरण्यात येऊ लागले़ तीन वर्षे हा उपक्रम राबवून त्याची पाहणी करण्यात आली असता शासनाच्या धोरणाप्रमाणे कारवाई झाली नसल्याने केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त करीत पुन्हा सन २०१७ पर्यंत या अभियानास गेल्या वर्षी मुदतवाढ दिली़गेल्या वर्षी ही मुदत वाढ देण्यात आली असली तरी केंद्र शासनाकडून प्रेरक व इतर शैक्षणिक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे गेल्या १७ महिन्यांपासून मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून प्रेरकांकडून सतत मागणी केली जात आहे़ परंतु, अद्यापही शासनाकडून मानधन मिळाले नाही़ त्यामुळे दररोज रात्री गावांत भरणारे शिक्षण केंद्र बंद पडले आहेत़ (प्रतिनिधी)सर्वे राहिला अर्धवट़़़या प्रेरकांच्या मदतीने जिल्ह्यातील कुटुंबांची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सर्वे सुरु करण्यात आला होता़ मानधनच थकित राहिल्याने प्रेरकांनी हा सर्वे अर्धवट स्थितीत सोडून दिला आहे़ त्यामुळे शिक्षण केंद्र बंद पडण्याबरोबरच सर्व्हेही अपूर्ण राहिला आहे़ प्रेरकांचे मानधनासाठी हेलपाटे सुरु आहेत़केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने प्रेरकांचे मानधन रखडले आहे़ हे मानधन मिळावे म्हणून निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती निरंतर शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी एस़ एस़ येलूरकर यांनी सांगितले़