शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित तलावातून पाण्याचा उपसा

By admin | Updated: July 18, 2014 01:45 IST

मोहनदास साखरे , मांडवा परळी तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जवळपास सर्वच तलावातील पाणी आरक्षित केले आहे.

मोहनदास साखरे , मांडवापरळी तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जवळपास सर्वच तलावातील पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणी समस्या बिकट झाली असल्यामुळे शेतकरी नाईलाजाने तलावातील पाणी शेतीला देत असल्याचे समोर आले आहे.परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे मांडवा परिसरात पाणी समस्या बिकट बनली आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे तर दोन लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तीन प्रकल्प मृतसाठ्यात तर उर्वरित साठवण तलावात निम्म्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यापूर्वी १ ते २ मोठे पाऊस झाले असल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती जगवणे कठीण बनले आहे. परळी तालुक्यात नागापूर, बोरणा व बोधेगाव येथे तीन मध्यम तर चांदापूर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, खोडवा सावरगाव, कातकटवाडी, मोहा, मालेवाडी, गोवलपूर, केरवाडी व दैठणा याठिकाणी लघु प्रकल्प आहेत. वास्तविक पाहता या दहाही गावांतील लघु प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. यामुळे लाखामोलाचे पाणी दरदिवशी वाया जात आहे. दरम्यान, परळी तालुक्यात जुलै महिन्यापर्यंत पाच मंडळामध्ये सरासरी १२६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे. यामुळे तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तीन प्रकल्पांनी तळ गाठला आहे तर काही तलावामध्ये अर्ध्यापेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे.परळी शहराची तहान भागविणाऱ्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परळी तालुक्यात पाणीसमस्या बिकट बनली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे ते प्रकल्पामधून पाणी काढून घेत आहेत. पावसाने पाठ फिरविल्यामुळे ही समस्या गंभीर झाली आहे.आरक्षित पाण्याचा उपसा होत असल्यामुळे पुढील काळात आणखी संकट बिकट होणार काय अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थांत होत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास या पाण्याचे व्यवसायीकरण होण्याचे नाकारता येत नाही. या संदर्भात एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मांडवा परिसरात केवळ २ मोठे पाऊस झाले आहेत. त्यावरच पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. पेरणीसाठी जवळपास ३० हजार रुपये खर्च आलेला आहे. आता पावसाने पाठ फिरविली असल्याने पाणी उपसा केल्याशिवाय पर्याय नाही.