शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
5
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
6
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
7
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
8
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
9
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
10
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
11
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
13
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
14
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
15
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
16
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
17
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
18
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
19
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
20
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

आरक्षित तलावातून पाण्याचा उपसा

By admin | Updated: July 18, 2014 01:45 IST

मोहनदास साखरे , मांडवा परळी तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जवळपास सर्वच तलावातील पाणी आरक्षित केले आहे.

मोहनदास साखरे , मांडवापरळी तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जवळपास सर्वच तलावातील पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणी समस्या बिकट झाली असल्यामुळे शेतकरी नाईलाजाने तलावातील पाणी शेतीला देत असल्याचे समोर आले आहे.परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे मांडवा परिसरात पाणी समस्या बिकट बनली आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे तर दोन लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तीन प्रकल्प मृतसाठ्यात तर उर्वरित साठवण तलावात निम्म्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यापूर्वी १ ते २ मोठे पाऊस झाले असल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती जगवणे कठीण बनले आहे. परळी तालुक्यात नागापूर, बोरणा व बोधेगाव येथे तीन मध्यम तर चांदापूर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, खोडवा सावरगाव, कातकटवाडी, मोहा, मालेवाडी, गोवलपूर, केरवाडी व दैठणा याठिकाणी लघु प्रकल्प आहेत. वास्तविक पाहता या दहाही गावांतील लघु प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. यामुळे लाखामोलाचे पाणी दरदिवशी वाया जात आहे. दरम्यान, परळी तालुक्यात जुलै महिन्यापर्यंत पाच मंडळामध्ये सरासरी १२६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे. यामुळे तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तीन प्रकल्पांनी तळ गाठला आहे तर काही तलावामध्ये अर्ध्यापेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे.परळी शहराची तहान भागविणाऱ्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परळी तालुक्यात पाणीसमस्या बिकट बनली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्यामुळे ते प्रकल्पामधून पाणी काढून घेत आहेत. पावसाने पाठ फिरविल्यामुळे ही समस्या गंभीर झाली आहे.आरक्षित पाण्याचा उपसा होत असल्यामुळे पुढील काळात आणखी संकट बिकट होणार काय अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थांत होत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास या पाण्याचे व्यवसायीकरण होण्याचे नाकारता येत नाही. या संदर्भात एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मांडवा परिसरात केवळ २ मोठे पाऊस झाले आहेत. त्यावरच पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. पेरणीसाठी जवळपास ३० हजार रुपये खर्च आलेला आहे. आता पावसाने पाठ फिरविली असल्याने पाणी उपसा केल्याशिवाय पर्याय नाही.