शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

लाईनमन वसुलीत व्यस्त, शेतकरी रोहित्राअभावी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST

लाडसावंगी : सध्या रबी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करीत आहे. मात्र, नादुरुस्त रोहित्रामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ...

लाडसावंगी : सध्या रबी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करीत आहे. मात्र, नादुरुस्त रोहित्रामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. महावितरण कंपनीकडून वेळेवर रोहित्र दुरुस्ती होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे. किरकोळ फाॅल्ट झाला तरी तासनतास वीज गायब होते. महावितरणचे कर्मचारी सध्या वीज बील वसूलीत व्यस्त आहेत. तर किरकोळ दुरुस्तीसाठी शेतकरी आपला जीव धोक्यात घालत असल्याची परिस्थिती सध्या परिसरात दिसत आहे.

सध्या रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस काम करीत आहे. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. रोहित्र किंवा विजेच्या खांबावर छोटा मोठा बिघाड झाला तरी, महावितरणचा कर्मचारी यासाठी उपलब्घ होत नसल्याने तासंतास विजपुरवठा खंडीत राहतो. डोळ्यासमाेर उभे पिक वाया जात असल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या अल्पज्ञानाच्या भरवशावर जीव धोक्यात घालून रोहित्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे धोकादायक असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचे महावितरण कंपनीला कसलेही सोयर सुतक दिसत नाही. त्यांचे कर्मचारी सध्या वसूलीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांनी तक्रारी करुनही कोणी दखल घेत नाहीत. वरिष्ठांनी दखल घेऊन आखंडीत विज देण्याची मागणी जि.प. सदस्य सुरेश शिंदे, प.स. सदस्य अर्जुन शेळके, सरपंच सुदाम पवार, रमेश शिंदे, भगवान साळवे, संजय भालेराव आदींनी केली आहे.

फोटो कप्शन : लाडसावंगी येथील शेतकरी जिव धोक्यात घालून डि.पी.ची अशी दुरुस्ती करावी लागत आहे.

चौकट

कोणी फोनही घेत नाहीत

लाडसावंगी परिसरात सध्या कोठेही रोहित्रात बिघाड झाला तर, तासंतास वीज गायब होते. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अनेकजण महावितरण कार्यालयात फोन करतात. मात्र, तेथे कोणी फोनही उचलत नाहीत. यामुळे शेतकरी स्वत: जीव धोक्यात घालून रोहित्रातील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. आधीच एक आठवडा दिवसा आठ तास तर एक आठवडा रात्री दहा तास विज मिळत आहे. त्यात सतत लपडाव व शुक्रवारी दिवसभर विज खंडीत राहात असल्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.

फोटो : लाडसावंगी परिसरात रोहित्रात बिघाड झाल्यामुळे महावितरणचा कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी स्वत: जीव धोक्यात घालून विजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.