शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

औट्रम घाटातून १५ सप्टेंबरनंतर हलक्या वाहनांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर ...

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर कार, दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, या दिशेने नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया प्रयत्न करीत आहे. जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक औरंगाबादमध्ये येणार असून, ते घाटातील भिंत उभारण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्ला देणार आहेत. त्यानंतर घाट पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला वेग येईल. मंगळवारी प्रकल्प संचालक अरविंद काळे व अभियंत्यांनी घाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे या मार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगाव दरम्यान औट्रमघाटात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.

प्रकल्प संचालकांनी दिलेली माहिती अशी

कार व दुचाकीची वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरपर्यंत घाटातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहेत. हलक्या वाहनांची वाहतुक सुरू होईल, असे एनएचएआयचे प्रयत्न आहेत. सीडी वर्कचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुक सुरळीत करणे शक्य होणार आहे. बुधवारी भोपाळचे तज्ज्ञ येणार आहेत. घाटात २५ मीटर उंचीची भिंत बांधावी लागणार आहे. त्याचे डिझाइन कसे असेल, भिंत कशी बांधावी लागेल, याबाबत ते तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर काम आणखी गतीने करण्यात येणार आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.