शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औट्रम घाटातून १५ सप्टेंबरनंतर हलक्या वाहनांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर ...

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर कार, दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, या दिशेने नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया प्रयत्न करीत आहे. जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक औरंगाबादमध्ये येणार असून, ते घाटातील भिंत उभारण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्ला देणार आहेत. त्यानंतर घाट पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला वेग येईल. मंगळवारी प्रकल्प संचालक अरविंद काळे व अभियंत्यांनी घाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे या मार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगाव दरम्यान औट्रमघाटात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.

प्रकल्प संचालकांनी दिलेली माहिती अशी

कार व दुचाकीची वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरपर्यंत घाटातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहेत. हलक्या वाहनांची वाहतुक सुरू होईल, असे एनएचएआयचे प्रयत्न आहेत. सीडी वर्कचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुक सुरळीत करणे शक्य होणार आहे. बुधवारी भोपाळचे तज्ज्ञ येणार आहेत. घाटात २५ मीटर उंचीची भिंत बांधावी लागणार आहे. त्याचे डिझाइन कसे असेल, भिंत कशी बांधावी लागेल, याबाबत ते तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर काम आणखी गतीने करण्यात येणार आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.