शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

औट्रम घाटातून १५ सप्टेंबरनंतर हलक्या वाहनांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर ...

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर कार, दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, या दिशेने नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया प्रयत्न करीत आहे. जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक औरंगाबादमध्ये येणार असून, ते घाटातील भिंत उभारण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्ला देणार आहेत. त्यानंतर घाट पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला वेग येईल. मंगळवारी प्रकल्प संचालक अरविंद काळे व अभियंत्यांनी घाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे या मार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगाव दरम्यान औट्रमघाटात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.

प्रकल्प संचालकांनी दिलेली माहिती अशी

कार व दुचाकीची वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरपर्यंत घाटातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहेत. हलक्या वाहनांची वाहतुक सुरू होईल, असे एनएचएआयचे प्रयत्न आहेत. सीडी वर्कचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुक सुरळीत करणे शक्य होणार आहे. बुधवारी भोपाळचे तज्ज्ञ येणार आहेत. घाटात २५ मीटर उंचीची भिंत बांधावी लागणार आहे. त्याचे डिझाइन कसे असेल, भिंत कशी बांधावी लागेल, याबाबत ते तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर काम आणखी गतीने करण्यात येणार आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.