शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

औट्रम घाटातून १५ सप्टेंबरनंतर हलक्या वाहनांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर ...

औरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेला औट्रमघाट सध्या तरी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. १५ सप्टेंबरनंतर कार, दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, या दिशेने नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया प्रयत्न करीत आहे. जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून तज्ज्ञ अभियंत्यांचे पथक औरंगाबादमध्ये येणार असून, ते घाटातील भिंत उभारण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्ला देणार आहेत. त्यानंतर घाट पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला वेग येईल. मंगळवारी प्रकल्प संचालक अरविंद काळे व अभियंत्यांनी घाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे या मार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगाव दरम्यान औट्रमघाटात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.

प्रकल्प संचालकांनी दिलेली माहिती अशी

कार व दुचाकीची वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरपर्यंत घाटातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहेत. हलक्या वाहनांची वाहतुक सुरू होईल, असे एनएचएआयचे प्रयत्न आहेत. सीडी वर्कचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुक सुरळीत करणे शक्य होणार आहे. बुधवारी भोपाळचे तज्ज्ञ येणार आहेत. घाटात २५ मीटर उंचीची भिंत बांधावी लागणार आहे. त्याचे डिझाइन कसे असेल, भिंत कशी बांधावी लागेल, याबाबत ते तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर काम आणखी गतीने करण्यात येणार आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.