शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

‘शेततळ्या’वर उड्या

By admin | Updated: April 15, 2016 01:49 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याचा मोठा आधार वाटू लागला आहे. म्हणूनच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत मराठवाड्यातील

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेततळ्याचा मोठा आधार वाटू लागला आहे. म्हणूनच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत मराठवाड्यातील तब्बल ४३ हजार शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली; पण अंतिम मुदतीपर्यंत त्यातील ३३ हजार जणांनीच अर्ज आणि शुल्काचा भरणा केला आहे. ही संख्यादेखील उद्दिष्टाच्या दुप्पट आहे. त्यामुळे विभागातील या ३३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १६ हजार २०० शेतकऱ्यांनाच शेततळ्यांचे अनुदान मिळू शकणार आहे.मराठवाड्यात काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यंदाही पाण्याअभावी खरीप आणि रबीची पिके गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांतर्गत राज्य सरकारने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना आणली आहे. त्या अंतर्गत कालपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. त्याला मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत शासनाने शेततळे खोदण्यासाठी जास्तीत जास्त ५० हजार रुपये अनुदान देऊ केले आहे. प्रत्यक्षात शेततळे खोदण्यासाठी लाख, दीड लाखांचा खर्च लागतो, याची कल्पना असूनदेखील उर्वरित रक्कम स्वत: खर्च करण्याची तयारी दाखवून असंख्य शेतकऱ्यांनी त्यांची नावनोंदणी केली आहे. मराठवाड्यात या योजनेंतर्गत एकूण ४३ हजार ७५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु नोंदणीनंतर अर्ज आणि त्याचे शुल्क भरणेही आवश्यक आहे. ती प्रक्रिया ३३ हजार २३४ शेतकऱ्यांनीच पूर्ण केली आहे. आता विविध निकषांच्या आधारे त्यातून उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकूण १६ हजार २०० इतके उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. त्यामुळे एवढ्याच शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी ही औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. याठिकाणी तब्बल ११ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर सर्वात कमी नोंदणी ही हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. जालना, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले आहेत.