शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
3
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
4
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
5
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
6
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
7
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
8
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
9
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
10
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
11
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
12
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

ज्योत आणणाऱ्या दोघांची प्राण‘ज्योत’ मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:49 IST

कडा : ते तिघे ज्योत घेऊन आनंदवाडीकडे निघाले होते. रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि दोघांची प्राण‘ज्योत’ मालवली

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आरणगावहून ज्योत आणण्याची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी तरूणांचा पुढाकार असतो. हीच परंपरा कायम ठेवत ते तिघे ज्योत घेऊन आनंदवाडीकडे निघाले होते. रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि दोघांची प्राण‘ज्योत’ मालवली. या घटनेने गाव सुन्न झाले आहे.गणेश जनार्दन बोडखे (२५) व अजित आप्पासाहेब बोडखे (२७) असे ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत, तर अविनाश महादेव ननावरे हे गंभीर जखमी झाले आहेत. आष्टी तालुक्यातील आनंदवाडीमध्ये संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमत्त अखंड हरिनाम सप्ताह असतो. सात दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते. आनंदवाडीसह परिससरातील अनेक गावांतील नागरिक येथे येत असतात. त्यामुळे सात दिवस वातावरण भक्तिमय होते. शनिवारी या सप्ताहाची सांगता होती. दरम्यान, गावातील २० ते २५ तरूण प्रत्येक वर्षी आरणगावहून ज्योत घेऊन सांगताच्या दिवशी गावात पोहचतात. त्याप्रमाणे हे तरूण आनंदवाडीच्या दिशेने निघाले होते. २० ते २५ तरूण पायी चालत होते. तर सोबत असलेल्या दुचाकीवर गणेश, अजित व अविनाश बसलेले होते. रात्री दोनची वेळ होती. मुखी नामजप सुरू होता. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच २३ एएन ७०७८) या तरूणांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.ही घटना चापडगाव (जि.अहमदनगर) यामध्ये गणेश व अजित जागीच ठार झाले. तर अविनाध ट्रकच्या धडकेने रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. यामुळे तो बचावला. त्याला सोबतच्या तरूणांनी तात्काळ कर्जतच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोही सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.