शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

८ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: September 15, 2015 00:21 IST

औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही.

औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ या वर्षातील शेतकरी आत्महत्येच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अत्यल्प आहे. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीपातळी खालावली आहे. ७०० फुटांपेक्षा खोल असलेल्या कुपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. हंगामी शेती करणाऱ्यांबरोबरच बागायतदारांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा तर पावसाने गुंगारा दिला आहे. तालुक्यातील सर्व भागांत पाऊस न झाल्याने खरीपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. शेतीतून उत्पादन न निघाल्याने हवालदिल झालेल्या तालुक्यातील ९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्राच संपविली आहे. जानेवारीत बोेरफळ येथे १, मार्चमध्ये बिरवली आणि सेलू येथे प्रत्येकी १, मे महिन्यात येळी आणि हरेगाव येथे प्रत्येकी १, जुलैमध्ये हासेगाववाडी व वानवडा येथे प्रत्येकी १ तर आॅगस्टमध्ये होळी आणि वानवडा येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले आहे. आठ महिन्यांत नऊ जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. (वार्ताहर)