शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

पाण्यासाठी जीवघेणी कसरत

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.डोंगराळ भाग असलेल्या लक्ष्मण नाईक तांडा परिसरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते; परंतु गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई जाणवली नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाण्याबाबत ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लक्ष्मण नाईक तांडा या गावासाठी १५ वर्षापासून पाणीटंचाई निवारणार्थ शासनाकडून ३ योजना राबविल्या गेल्या. यामध्ये जलस्वराज्य प्रकल्प, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आमदार फंडातून या योजनेवर जवळपास ५० लाख रूपये खर्च झाले असून सुद्धा लक्ष्मण नाईक तांडा येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे.जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे; परंतु या योजनेत पाईपलाईनचे काम बरोबर झाले नसल्यामुळे गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली आहे. या गावातील सार्वजनिक विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणी भरावे लागते. गेल्या आठवड्यात पाणी काढत असताना एका तरुणाचा तोल गेल्याने याच विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढी मोठी घटना घडून सुद्धा प्रशासनाने पाणी प्रश्न सोडविलेला नाही, हे विशेष. (वार्ताहर)