शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

पाण्यासाठी जीवघेणी कसरत

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.डोंगराळ भाग असलेल्या लक्ष्मण नाईक तांडा परिसरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते; परंतु गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई जाणवली नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाण्याबाबत ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लक्ष्मण नाईक तांडा या गावासाठी १५ वर्षापासून पाणीटंचाई निवारणार्थ शासनाकडून ३ योजना राबविल्या गेल्या. यामध्ये जलस्वराज्य प्रकल्प, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आमदार फंडातून या योजनेवर जवळपास ५० लाख रूपये खर्च झाले असून सुद्धा लक्ष्मण नाईक तांडा येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे.जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे; परंतु या योजनेत पाईपलाईनचे काम बरोबर झाले नसल्यामुळे गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली आहे. या गावातील सार्वजनिक विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणी भरावे लागते. गेल्या आठवड्यात पाणी काढत असताना एका तरुणाचा तोल गेल्याने याच विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढी मोठी घटना घडून सुद्धा प्रशासनाने पाणी प्रश्न सोडविलेला नाही, हे विशेष. (वार्ताहर)