शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

गळा दाबून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:02 IST

नुकसान भरपाई आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी ज्योती (२५) ...

नुकसान भरपाई आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी

प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग

औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी ज्योती (२५) हिचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली आरोपी पती रामदास केरुबा साळवे (४०, मूळ रा . बाळखेडा ता.कन्नड , हल्ली राजीवनगर झोपडपट्टी , औरंगाबाद ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी गुरुवारी ( दि.२०) जन्मठेपेची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला.

मृत ज्योतीची बहीण आशाबाई दिलीप धनराज यांच्या फिर्यादीवरून रामदासविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. आव्हाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी खटल्याच्या सुनावणीत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी ज्योतीचा भाऊ सुनील जगताप आणि डॉक्टरांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी रामदासला जन्मठेप आणि दंड ठोठावला. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम तायडे यांनी सहकार्य केले.

खुनाच्या घटनेच्या ३ वर्षांपूर्वी ज्योती आणि रामदासचे लग्न झाले होते. रामदास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिला नेहमी मारहाण करीत होता. घटनेच्या ५ महिन्यापूर्वी रामदास त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी अश्विनी (१२) हिला सोबत घेऊन रेल्वे स्थानकालगतच्या राजीवनगर झोपडपट्टी येथे राहण्यास गेला होता. तर ज्योती तिचा मुलगा आदित्य (दीड वर्ष ) याच्यासोबत अब्रार कॉलनी येथे राहत होती.

१५ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी रामदास ज्योतीला घेऊन राजीवनगर येथे गेला होता. रामदास त्याच दिवशी सायंकाळी ज्योतीचा चुलत भाऊ सुनील जगताप यांच्या घरी गेला व ज्योती लघवीचा बाहाणा करून निघून गेली आहे. तुमच्याकडे आली का अशी चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी सासू सासऱ्याच्या घरून रामदास मुलगा आदित्य याला घेऊन गेला होता. त्यानंतर बहीण भावंडांनी शोध घेतला असता राजीवनगर येथील रामदासच्या खोलीत ज्योती बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेली, तिच्या नाका तोंडातून रक्त आलेले आणि तिचा गळा दाबल्याच्या खुणा दिसल्या होत्या. पोलिसांनी ज्योतीला घाटी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

चौकट

पुनर्वसन आणि भरपाईसाठी प्रकरण

विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग

मृताचा अल्पवयीन मुलगा आणि मुलीचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाईसाठी सत्र न्यायालयाने हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या

कलम ३५७(ए ) नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आदेशात म्हटले आहे.