शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा जाळून खून करणाऱ्यास जन्मठेप व दंड

By admin | Updated: September 15, 2015 00:35 IST

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. सुरेश गिरी हा पत्नी बेबी, मुलगा रमेश आणि मुलगी माया यांच्यासह राजनगर, मुकुंदवाडी येथे राहत होता. १८ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान बेबीबाई स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिचा पती सुरेश दारू पिऊन आला. आपली मुलगी माया हिची सोयरीक बेबीने तिच्या माहेरच्या नात्यात गावाकडे का जमविली. मला मुलगी तेथे द्यायची नाही, असे म्हणून सुरेश पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्यावर बेबीबाई म्हणाली की, मुलगा चांगला आहे. मला मुलगी तेथेच द्यायची आहे. यावरून दोघांत वाद झाला. सुरेशने बेबीला मारहाण करून ‘तुला मारूनच टाकतो, जाळून टाकतो’ असे म्हणून स्टोव्हमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. बेबीने आरडाओरड केल्यानंतर सुरेश पळून गेला, तर आईचा आवाज ऐकून छतावर झोपलेला मुलगा आणि मुलगी खाली आले. मुलगा रमेश (२०) याने आईच्या अंगावर रग टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. रमेशने सर्व नातेवाईकांना फोन करून घटनेविषयी माहिती दिली. बेबीबाई ६० टक्के भाजली होती. तिचा मुलगा, मुलगी आणि शेजारी गोरखनाथ जाधव यांनी बेबीबाईला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे पोलीस जमादार ए.आर. बिघोत यांनी तिचा जबाब नोंदविला असता तिने वरीलप्रमाणे हकिकत सांगितली. यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमित घुले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्टोव्ह, रॉकेलची कॅन आणि कपड्याचे तुकडे जप्त केले. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायदंडाधिकारी स.मु. गोखले यांनी पुन्हा बेबीबाईचा जबाब नोंदविला. त्यावेळीही तिने वरीलप्रमाणेच हकिकत सांगितली. १९ सप्टेंबर २०१२ रोजी बेबी मरण पावली. त्यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता राजेंद्र पी. मुगदिया यांनी एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी आरोपीचा मुलगा, मुलगी व इतर दोन, असे एकूण चार साक्षीदार फितूर झाले. बिघोत, गोखले आणि जाधव यांचे जबाब महत्त्वाचे ठरले.