शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

पत्नीचा जाळून खून करणाऱ्यास जन्मठेप व दंड

By admin | Updated: September 15, 2015 00:35 IST

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून पत्नी बेबीबाई हिचा जाळून खून करणारा तिचा पती सुरेश बाबू गिरी (५०) याला सत्र न्यायाधीश यू.एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. सुरेश गिरी हा पत्नी बेबी, मुलगा रमेश आणि मुलगी माया यांच्यासह राजनगर, मुकुंदवाडी येथे राहत होता. १८ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान बेबीबाई स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिचा पती सुरेश दारू पिऊन आला. आपली मुलगी माया हिची सोयरीक बेबीने तिच्या माहेरच्या नात्यात गावाकडे का जमविली. मला मुलगी तेथे द्यायची नाही, असे म्हणून सुरेश पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्यावर बेबीबाई म्हणाली की, मुलगा चांगला आहे. मला मुलगी तेथेच द्यायची आहे. यावरून दोघांत वाद झाला. सुरेशने बेबीला मारहाण करून ‘तुला मारूनच टाकतो, जाळून टाकतो’ असे म्हणून स्टोव्हमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. बेबीने आरडाओरड केल्यानंतर सुरेश पळून गेला, तर आईचा आवाज ऐकून छतावर झोपलेला मुलगा आणि मुलगी खाली आले. मुलगा रमेश (२०) याने आईच्या अंगावर रग टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. रमेशने सर्व नातेवाईकांना फोन करून घटनेविषयी माहिती दिली. बेबीबाई ६० टक्के भाजली होती. तिचा मुलगा, मुलगी आणि शेजारी गोरखनाथ जाधव यांनी बेबीबाईला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे पोलीस जमादार ए.आर. बिघोत यांनी तिचा जबाब नोंदविला असता तिने वरीलप्रमाणे हकिकत सांगितली. यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमित घुले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्टोव्ह, रॉकेलची कॅन आणि कपड्याचे तुकडे जप्त केले. दुसऱ्या दिवशी विशेष न्यायदंडाधिकारी स.मु. गोखले यांनी पुन्हा बेबीबाईचा जबाब नोंदविला. त्यावेळीही तिने वरीलप्रमाणेच हकिकत सांगितली. १९ सप्टेंबर २०१२ रोजी बेबी मरण पावली. त्यावरून सुरेशविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता राजेंद्र पी. मुगदिया यांनी एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी आरोपीचा मुलगा, मुलगी व इतर दोन, असे एकूण चार साक्षीदार फितूर झाले. बिघोत, गोखले आणि जाधव यांचे जबाब महत्त्वाचे ठरले.