शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

९ आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:43 IST

बीड तालुक्यातील नेकनूर येथील महावीर सुरवसे खून प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयाने १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. २३ वर्षे खटला चालल्यानंतर १४ पैकी ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड तालुक्यातील नेकनूर येथील महावीर सुरवसे खून प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयाने १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. २३ वर्षे खटला चालल्यानंतर १४ पैकी ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर तिघांचे सुनावणीदरम्यान निधन झाले.नेकनूरपासून जवळच असलेल्या कुंभारी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत अविश्वास ठराव मांडण्याप्रकरणी गावातील १४ जणांनी महावीर सुरवसे, सुमंत भालेराव व वचिष्ठ वाघमारे या तिघांना बेदम मारहाण केली होती. त्यात महावीर सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला होता. नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने या १४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात फिर्यादी सुमंत भालेराव व राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. पी.व्ही. नलावडे व न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठाने १४ पैकी ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये रावसाहेब सुरवसे, मनोहर सुरवसे, भास्कर ऊर्फ बंडू सुरवसे, बाबूराव सुरवसे, भाऊसाहेब सुरवसे, पंजाब सुरवसे, चंद्रसेन सुरवसे, शहाजी सुरवसे, शिवाजी सुरवसे यांचा समावेश आहे.शासनातर्फे सहायक सरकारी वकील सचिन सलगारे, तर फिर्यादी सुमंत भालेराव यांच्या वतीने एम.जी. कोळसे यांनी बाजू मांडली.अंतिम सुनावणीत खंडपीठाने दिगंबर सुरवसे व मोहन काळे यांची निर्दोष मुक्तता केली. सुनावणी प्रक्रियेदरम्यान आरोपी लिंबाजी सुरवसे, गोरख वाघ व उद्धव सुरवसे यांचे निधन झाले होते. सरपंच पद निवडीवेळी आरोपी उद्धव लिंबाजी सुरवसे विरुद्ध महावीर भीमराव सुरवसे यांनी अविश्वास ठराव दर्शविला होता. तसेच नवीन घरकुल योजनेच्या वाटपातही विरोध केला होता.