शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

2000 रुग्णांना जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: August 6, 2014 02:23 IST

परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़

परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़ या रुग्णांच्या उपचारावर आतापर्यंत ५ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली़ जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे़ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांबरोबरच अंत्योदय योजनेतील नागरिक जीवनदायी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत़ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबधारकास या योजनेचा लाभ घेता येतो़ जिल्ह्यामध्ये ३ लाख ६० हजार लाभार्थी आहेत़ या योजनेंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाख रुपयापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून उपचार केला जातो़ महाराष्ट्र शासनाची ही ऐतिहासिक योजना आहे़ जिल्ह्याबरोबरच राज्यात कुठेही रुग्णाला या योजनेमध्ये उपचार घेता येतात़ परभणी जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबरच करीम हॉस्पिटल, स्वाती क्रिटीकेअर आणि सिद्धी विनायक रुग्णालय या रुग्णालयामध्ये जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो. परभणी जिल्ह्यातील २ हजार २९८ लोकांनी आतापर्यंत या योजनेत उपचार करून घेतले आहेत़ त्यात कॅन्सर, हृदयविकार यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांना फायदा झाला आहे़ १० महिन्यांमध्ये या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ जिल्ह्यातील चार केंद्रांवर आतापर्यंत ३३ लाख ३२ हजार रुपयांचे उपचार करण्यात आले आहेत़ त्यापैकी जिल्हा रुग्णालयात ८ लाख ६१ हजार रुपये खर्चाचे उपचार झाले असून, इतर उर्वरित रक्कमेचे उपचार तीन केंद्रांवर झाले. हृदयविकार, कर्करोग यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्याची क्षमता गोरगरीब नागरिकांना नसते़ अशा वेळी जीवनदायी आरोग्य योजना या नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे़ एकूण ९७१ आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जात आहे़ तसेच किडनी बदलण्यासारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंत खर्च शासनाकडून केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)