शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

2000 रुग्णांना जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: August 6, 2014 02:23 IST

परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़

परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़ या रुग्णांच्या उपचारावर आतापर्यंत ५ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली़ जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे़ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांबरोबरच अंत्योदय योजनेतील नागरिक जीवनदायी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत़ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबधारकास या योजनेचा लाभ घेता येतो़ जिल्ह्यामध्ये ३ लाख ६० हजार लाभार्थी आहेत़ या योजनेंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाख रुपयापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून उपचार केला जातो़ महाराष्ट्र शासनाची ही ऐतिहासिक योजना आहे़ जिल्ह्याबरोबरच राज्यात कुठेही रुग्णाला या योजनेमध्ये उपचार घेता येतात़ परभणी जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबरच करीम हॉस्पिटल, स्वाती क्रिटीकेअर आणि सिद्धी विनायक रुग्णालय या रुग्णालयामध्ये जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो. परभणी जिल्ह्यातील २ हजार २९८ लोकांनी आतापर्यंत या योजनेत उपचार करून घेतले आहेत़ त्यात कॅन्सर, हृदयविकार यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांना फायदा झाला आहे़ १० महिन्यांमध्ये या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ जिल्ह्यातील चार केंद्रांवर आतापर्यंत ३३ लाख ३२ हजार रुपयांचे उपचार करण्यात आले आहेत़ त्यापैकी जिल्हा रुग्णालयात ८ लाख ६१ हजार रुपये खर्चाचे उपचार झाले असून, इतर उर्वरित रक्कमेचे उपचार तीन केंद्रांवर झाले. हृदयविकार, कर्करोग यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्याची क्षमता गोरगरीब नागरिकांना नसते़ अशा वेळी जीवनदायी आरोग्य योजना या नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे़ एकूण ९७१ आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जात आहे़ तसेच किडनी बदलण्यासारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंत खर्च शासनाकडून केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)