शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यात १५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST

जि. प. कृषी विभाग : खरेदीवेळीच इ पाॅज मशीनवर नोंदणी न करणे भोवले --- औरंगाबाद : जिल्ह्यात खत विक्रीच्या ...

जि. प. कृषी विभाग : खरेदीवेळीच इ पाॅज मशीनवर नोंदणी न करणे भोवले

---

औरंगाबाद : जिल्ह्यात खत विक्रीच्या योग्य नोंदी न ठेवणे, एकाच शेतकऱ्याच्या नावावर जास्त विक्री दाखवल्याची प्रकरणे चौकशीत समोर आल्याने १५ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली. यापुर्वीही २७ खत विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांंनी दिली.

सध्या जिल्ह्यात रबीसाठी खताच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरु आहे. सर्वाधिक अडचण युरियात येते. या खतावर सर्वाधिक सबसीडी असते. तर खताचे नियोजन करतांना कोणत्या शेतकऱ्याकडे किती क्षेत्र आहे. त्याचा वापर किती आहे, याकडे केंद्र शासन कटाक्षाने लक्ष देत असुन दर पंधरा दिवसांना त्यांचा आढावाही घेत आहे. विक्रेत्यांकडे असलेला भौतीक साठा, विक्रीचे पावती पुस्तक व इ पाॅजवरच्या त्याच वेळी नोंदी केल्या तर मागणी पुरवठ्यातील तफावत लक्षात येते. मात्र, विक्रेत्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. तर अनेकदा शेतकरीही त्यासाठी आधार क्रमांक देण्यास टाळाटाळ करतांना दिसुन आले आहे. युरिया खताच्या तुटवड्यावेळी अनेक शेतकऱ्याच्या नावावर खतांची खरेदीची नोंद नव्हती तर एकाच शेतकऱ्याच्या नावावर अधिक नोंदी आढळून आल्या. त्याच्या चौकशी अंती जिल्हात १५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबीत केल्या गेले.

--

सर्वाधिक सोयगांव तालुक्यात ८ परवाने निलंबीत

--

जिल्ह्यात ११८३ खत विक्रेते आहेत. त्यापैकी सबसिडीचे खत सुमारे ६०० विक्रेते खत विक्री करतात. त्यापैकी सोयगांव तालुक्यात ८, गंगापूर, कन्नड, फुलंब्री तालुक्यात प्रत्येकी एक तर पैठण तालुक्यात ४ अशा १५ जणांवर परवाने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.

---

शेतकऱ्यांनी खरेदीवेळी आधारकार्ड व

ई पाॅजवर नोंद भरण्याकडे लक्ष द्यावे

---

अनेक खतांवर सबसिडी मिळते. त्यामुळे कमी किंमतीत खते शेतकऱ्यांना उपलब्ध होतात. या खतांच्या सबसीडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल सबसीडी माॅनिटरींगच्या कार्यक्रमाअंतर्गत शेवटच्या टप्प्यात इ पाॅज यंत्र खतविक्रेत्यांकडे देण्यात आले. त्यावर खरेदीवेळीच नोंद घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हस्ते खरेदी असेल तरीही शेतकऱ्याचा आधार क्रमांक सोबत बाळगून ती नोंद व्यवस्थित करुन घेण्याकडे शेतकऱ्यांनीही लक्ष दिल्यास विक्रेता व शेतकरी दोघांनाही अडचणी येणार नाहीत. असे गंजेवार म्हणाले.