शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चीनच्या विकासाचे प्रतिबिंब येथेही उमटवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. या कामांचे प्रतिबिंब ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही उमटणार असल्याचे मत महापौर बापू घडमोडे व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाने एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चीनमधील चकचकीत आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांची बांधणी, कचऱ्यावर प्रक्रिया करून राख तयार करण्याची कामेही औरंगाबादेत राबविण्याचा मानस शिष्टमंडळाने व्यक्त केला.सहा दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी मनपाचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. मंगळवारी दुपारी महापौर बापू घडमोडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, नगरसेवक कचरू घोडके, आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी चीन दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. चेंगडू या शहरात एका खाजगी कंपनीच्या सहकार्याने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. दररोज २,४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून राख तयार करण्यात येते. या राखेपासून विटा तयार करण्यात येतात. अवघे ७५ कर्मचारी हा संपूर्ण प्रकल्प अत्याधुनिक पद्धतीने हाताळतात. औरंगाबादेत दररोज ५०० टन कचरा जमा होतो. येथे हा प्रकल्प राबविण्यासाठी खर्चही कमी येईल, संबंधित कंपनीशी प्राथमिक बोलणे झाले आहे. चेंगडू शहरातील रस्त्यांचा दर्जा पाहून महापालिकेचे शिष्टमंडळ अवाक् झाले. कुठेच कचऱ्याचा कणही दिसून येत नाही. कमी जागेत सुंदर दुभाजक, प्रत्येक प्रमुख रस्ता किमान सहा पदरी ठेवण्यात आला आहे. सायकल ट्रॅक, दुचाकीसाठी वेगळी लाईन, चारचाकीसाठी वेगळी लाईन असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही डोळे दिपवणारी असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने नमूद केले. पांडा सफारी पार्कची योजना औरंगाबादेतही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ड्युनहाँग शहर वाळवंटी प्रदेश आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अप्रतिम योजना आखण्यात आल्या आहेत.येथील वाळूतून संगीत निघते, असे मार्केटिंग करण्यात आले असून, पॅराग्लायडिंग, हेलिकॉप्टरद्वारे हवाई सफरही घडविण्यात येते. वाळवंटातही पाण्याची नदी आणण्यात आली आहे. याच भागात इ.स. ८ व्या शतकातील गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत. ३२ आणि २३ फुटी मूर्ती पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत.नागरिकांमध्ये देशाबद्दल प्रचंड आस्थाचीनमधील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल प्रचंड आस्था आहे. देशप्रेमाने भारावलेल्या या मंडळींनी भारतातील कोणत्याही शहरापेक्षा १०० वर्षे पुढील विकास करून ठेवला आहे. त्याची तुलना अजिबात होऊ शकत नाही. तंत्रज्ञानातही या देशाने गगनभरारी घेतली आहे. दुसऱ्या देशाचे कोणतेच तंत्रज्ञान त्यांना मान्य नाही. त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे.