शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

चीनच्या विकासाचे प्रतिबिंब येथेही उमटवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. या कामांचे प्रतिबिंब ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही उमटणार असल्याचे मत महापौर बापू घडमोडे व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाने एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चीनमधील चकचकीत आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांची बांधणी, कचऱ्यावर प्रक्रिया करून राख तयार करण्याची कामेही औरंगाबादेत राबविण्याचा मानस शिष्टमंडळाने व्यक्त केला.सहा दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी मनपाचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. मंगळवारी दुपारी महापौर बापू घडमोडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, नगरसेवक कचरू घोडके, आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी चीन दौऱ्याची सविस्तर माहिती दिली. चेंगडू या शहरात एका खाजगी कंपनीच्या सहकार्याने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. दररोज २,४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून राख तयार करण्यात येते. या राखेपासून विटा तयार करण्यात येतात. अवघे ७५ कर्मचारी हा संपूर्ण प्रकल्प अत्याधुनिक पद्धतीने हाताळतात. औरंगाबादेत दररोज ५०० टन कचरा जमा होतो. येथे हा प्रकल्प राबविण्यासाठी खर्चही कमी येईल, संबंधित कंपनीशी प्राथमिक बोलणे झाले आहे. चेंगडू शहरातील रस्त्यांचा दर्जा पाहून महापालिकेचे शिष्टमंडळ अवाक् झाले. कुठेच कचऱ्याचा कणही दिसून येत नाही. कमी जागेत सुंदर दुभाजक, प्रत्येक प्रमुख रस्ता किमान सहा पदरी ठेवण्यात आला आहे. सायकल ट्रॅक, दुचाकीसाठी वेगळी लाईन, चारचाकीसाठी वेगळी लाईन असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही डोळे दिपवणारी असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने नमूद केले. पांडा सफारी पार्कची योजना औरंगाबादेतही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ड्युनहाँग शहर वाळवंटी प्रदेश आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अप्रतिम योजना आखण्यात आल्या आहेत.येथील वाळूतून संगीत निघते, असे मार्केटिंग करण्यात आले असून, पॅराग्लायडिंग, हेलिकॉप्टरद्वारे हवाई सफरही घडविण्यात येते. वाळवंटातही पाण्याची नदी आणण्यात आली आहे. याच भागात इ.स. ८ व्या शतकातील गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत. ३२ आणि २३ फुटी मूर्ती पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत.नागरिकांमध्ये देशाबद्दल प्रचंड आस्थाचीनमधील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल प्रचंड आस्था आहे. देशप्रेमाने भारावलेल्या या मंडळींनी भारतातील कोणत्याही शहरापेक्षा १०० वर्षे पुढील विकास करून ठेवला आहे. त्याची तुलना अजिबात होऊ शकत नाही. तंत्रज्ञानातही या देशाने गगनभरारी घेतली आहे. दुसऱ्या देशाचे कोणतेच तंत्रज्ञान त्यांना मान्य नाही. त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे.