शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

शिक्षण समितीच्या बैठकीकडे सदस्यांची पाठ !

By admin | Updated: November 18, 2015 00:38 IST

उस्मानाबाद : एकीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वर्षागणिक खालावत आहे. ही परिस्थिती सुधारण्याच्या अनुषंगाने शिक्षण समितीच्या बैठकीत मंथन होवून निर्णय घेणे अपेक्षित आहे.

उस्मानाबाद : एकीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वर्षागणिक खालावत आहे. ही परिस्थिती सुधारण्याच्या अनुषंगाने शिक्षण समितीच्या बैठकीत मंथन होवून निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु, या उद्देशाला समितीवरील सदस्यांकडून हरताळ फासला जात आहे. समितीवर नऊ सदस्य असताना मंगळवारी झालेली बैठक सभापतींसह अवघ्या दोन सदस्यांवर पार पडल्याचे समजते. विशेष म्हणजेच बैठकीस एक सदस्य पतीही उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत नेमके चाललेय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये शेतकरी, शेतमजुरांसह आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुले ज्ञानाचे धडे गिरवितात. याच शाळांची गुणवत्ता वर्षागणिक ढासळू लागली आहे. गुणवत्तेची होणारी पडझड रोखण्यासाठी शिक्षण समितीच्या बैठकीत मंथन होणे अपेक्षित असते. समितीवरील सदस्यांनी अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणून निर्णय घेणे गरजेचे असते. या समितीवर वर्णी लागावी म्हणून धवाधाव करणारी सदस्य मंडळी निवड झाल्यानंतर बैठकांना साधी उपस्थिती लावण्याची तसदी घेत नसल्याचा चिंताजनक प्रकार मंगळवारी झालेल्या बैठकीतून समोर आला आहे. नेहमीप्रमाणे दुपानंतर बैठकीला सुरूवात झाली. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी झाडून बैठकीला हजर राहिले. परंतु, जनतेचे कैवारी म्हणवून घेणारी सदस्य मंडळी मात्र, पूर्ण संख्येने हजर नव्हती. शिक्षण समितीचे सभापती सुधाकर गुंड यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे, स्वीकृत सदस्य प्रकाश आष्टे आणि एक सदस्य पती सभागृहामध्ये होते. तर समितीवरील सभापती बाबुराव राठोड, सुभाष माळी, कैलास शिंदे, मिनाताई सूळ, धनश्री ढंगे, अर्चनाताई पाटील आणि अर्चनाताई शेळके हे पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे बोटावर मोजण्याइतपतच सदस्यांवर ही बैठक उरकली गेली. समितीवरील सर्व पदाधिकारी हजर नसतील, तर त्या बैठकीला गांभीर्य तरी येणार कसे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अशा स्वरूपाचे चिंताजनक चित्र असेल तर यातून शाळांची गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने ठोस निर्णय होणार तरी कसे? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. एकीकडे एखादी बैठक वा सभेला संबंधित विभागाचे प्रमुख अथवा अन्य अधिकारी उपस्थित नसतील, तर यातीलच काही मंडळी सभागृह दणाणून सोडतात. तसेच कारवाईच्या मागणीसाठी अर्धा-अर्धा तास सभागृहात चर्चा घडवून आणतात. आता हेच जनतेचे कैवारी ‘शिक्षण’सारख्या महत्वाच्या समितीच्या बैठकीला हजेरी लावत नसतील, तर त्यांच्याविरूद्ध कोण कारवाई करणार? असा प्रश्न या निमित्ताने शिक्षण प्रेमी उपस्थित करू लागले आहेत. (प्रतिनिधी)