शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

कर्ज पुनर्गठनाकडे शेतकऱ्यांची पाठ !

By admin | Updated: July 8, 2016 00:36 IST

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता.

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. परंतु, जिल्ह्यात कर्ज पुनर्गठनास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे. ३७ हजार शेतकरी पात्र असताना आजवर अवघ्या १ हजार ६८ शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले. पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नसल्याची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. अशा परिस्थितीत खरीप पेरणीसाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. हे संकट लक्षात घेऊन शासनाने जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेऊन ही प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि सर्व बँकांना दिले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ११ हजार ३७, राष्ट्रीयकृत बँकेचे १५ हजार ९६६, खाजगी बँकेचे ३ हजार ८९९ आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलेले ६ हजार ४७४ असे एकूण ३७ हजार ३७६ शेतकरी कर्जाच्या पुनर्गठनासाठी पात्र होते. या सर्व शेतकऱ्यांकडे मिळून सुमारे २७ हजार २५४.७९ लाख रूपये एवढे पीक कर्ज आहे. परंतु, शासनाच्या या योजनेनुसार पुर्नगठन झाले तरी भरावी लागणारी वाढीव रक्कम व यादरम्यान मिळणाऱ्या नवीन वाढीव कर्जाची रक्कम अल्प असल्याने पुनर्गठनासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. पुनर्गठन करूनही हाती काहीच पडत नाही. केवळ थकबाकीतील कर्ज चालू बाकीत येते, अशी भावना शेतकरी बोलून दाखवित आहेत. यामुळेच की काय पुनर्गठनाची प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. आजवर ३७ हजार ३७६ पैकी आजवर केवळ १ हजार ६८ शेतकऱ्यांच्या कर्जाच्या कर्जाचे पुनर्गठन झाले.सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या चलन तुटवड्याचा सामना करीत आहे. त्यामुळे ११ हजार ३७ पैकी एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन होऊ शकले नाही. संबंधित शेतकऱ्यांकडे ३०७८.७९ लाख रूपये कर्ज आहे. राष्ट्रीयकृत बँकांचाही ‘परफॉर्मन्स’ फारसा समाधानकारक नाही. १५ हजार ९६६ पैकी केवळ १ हजार ६८ जणांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. खाजगी बँकांची कामगिरी तर अत्यंत निराशाजनक आहे. ३ हजार ८९९ पैकी एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. या सर्व शेतकऱ्यांकडे सुमारे ३ हजार २०६ लक्ष रूपये कर्ज आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलेल्यांपैकी ६ हजार ४७४ शेतकरी कर्जाच्या पुनर्गठनासाठी पात्र आहेत. यांच्याकडे ६ हजार ८१५ लाख रूपये कर्ज आहे. परंतु, आजवर एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही, हे विशेष. (प्रतिनिधी)