शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

घुशीच्या उकिरावर बसून चिमुकले गिरवताहेत धडे !

By admin | Updated: December 24, 2016 22:00 IST

येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अंगणवाडीला (क्र.२३) घूस लागली आहे.

येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अंगणवाडीला (क्र.२३) घूस लागली आहे. घुशीने उकिर काढल्यामुळे अख्ख्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात माती साठली आहे. त्यामुळे चिमुकल्यांना या उकिरावर बसूनच ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. अंगणवाडी सुपरवाजर यांनी ही धोकादायक बाब वरिष्ठांना कळविली आहे. परंतु, याबाबत कुठल्याही स्वरूपाचा तोडगा निघालेला नाही. चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकारीच गंभीर नसल्याने अंगणवाडीला टाळे ठोकण्याची भूमिका पालकांतून बोलून दाखविली जात आहे.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. येथून चिमुकल्यांना पोषण आहारासोबतच ज्ञानाचे धडेही दिले जातात. परंतु, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अंगणवाडीतील (क्र.२३) चित्र पाहिल्यानंतर चिमुकले अंगणवाडीत बसतात कसे? अन् पोषण आहार खातात कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही. शाळा तसेच अंगणवाड्यांनी मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती पाऊले उचलावित, असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. परंतु, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून ही बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसून येते. येडशी येथील अंगणवाडीमध्ये (क्र.२३) वीस चिमुकले ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. परंतु, ज्या खोलीत विद्यार्थी बसतात, तेथे घुशीने उकीर काढले आहेत. उकिराच्या माध्यमातून निघालेली माती आणि मुरूम खोलीतच पडून आहे. त्यामुळे चिमुकल्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. आहार शिजविण्यासाठी किचनशेड उभारण्यात आले आहे. प्रत्यक्षात वर्गामध्येच आहार शिजविला जातो. याचाही त्रास चिमुकल्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत पालकांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष न घातल्यास अंगणवाडीला टाळे ठोकू, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याबाबत येडशी बीटच्या सुपरवायजर पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की सदरील बाब ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात कळविल्याचे सांगितले. तर दोन ते तीन दिवसात दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी आनंद सोनटक्के म्हणाले.