शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘रोजगार हमी’कडे मजुरांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 23:21 IST

लातूर दुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़

आशपाक पठाण लातूरदुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़ २ लाख ४ हजार ३९६ नोंदणीकृत मजूर असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ एकच काम सुरू आहे़ टंचाईचा काळ वगळता अन्य वेळेत या कामाची कोणी मागणी करीत नसल्याने ब्रेक आहे़दुष्काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हजारो विहिरी मंजूर करण्यात आल्या़ गेल्या तीन वर्षांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध होईल आणि मजुरांनाही रोजगार मिळेल या हेतूने ३ हजार ७६८ विहिरींचे काम सुरू करण्यात आले होते़ यातील बहुतांश विहिरीचे काम ८० टक्के झाले असून काही विहिरींचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहेत़ पाऊस चांगला पडल्याने काम करता येत नसल्याने सर्वच विहिरींचे सध्या काम बंद आहेत़ दुष्काळात विहिरीबरोबरच रस्ते, नाला बल्डिंग, वनीकरण आदी कामांतून आठवड्याला जवळपास २० ते २५ हजार मजुरांना रोजगार मिळत होता़ यंदाच्या पावसाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाला जणू पूर्णविराम दिला़ सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नद्या, नाले, वाहिले़ विंधन विहिरी, विहीर, लघु, मध्यम प्रकल्पात पाणी असल्याने शेतीची कामे प्रगतीपथावर आहेत़ शेती कामासाठी महिला मजुरांना १५० ते २०० व पुरूषांना ३०० ते ४०० रूपये रोजगार असल्याने सरकारी कामाची मजुरांना आवश्यकता नसल्याचे चित्र आहे़ गावात कामे उपलब्ध असल्याने मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवली आहे.