शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

‘रोजगार हमी’कडे मजुरांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 23:21 IST

लातूर दुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़

आशपाक पठाण लातूरदुष्काळात मजुरांना रोजगारासाठी हक्काचे काम निर्माण करून देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अवस्था सध्या बिकट आहे़ २ लाख ४ हजार ३९६ नोंदणीकृत मजूर असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ एकच काम सुरू आहे़ टंचाईचा काळ वगळता अन्य वेळेत या कामाची कोणी मागणी करीत नसल्याने ब्रेक आहे़दुष्काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हजारो विहिरी मंजूर करण्यात आल्या़ गेल्या तीन वर्षांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध होईल आणि मजुरांनाही रोजगार मिळेल या हेतूने ३ हजार ७६८ विहिरींचे काम सुरू करण्यात आले होते़ यातील बहुतांश विहिरीचे काम ८० टक्के झाले असून काही विहिरींचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहेत़ पाऊस चांगला पडल्याने काम करता येत नसल्याने सर्वच विहिरींचे सध्या काम बंद आहेत़ दुष्काळात विहिरीबरोबरच रस्ते, नाला बल्डिंग, वनीकरण आदी कामांतून आठवड्याला जवळपास २० ते २५ हजार मजुरांना रोजगार मिळत होता़ यंदाच्या पावसाने गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाला जणू पूर्णविराम दिला़ सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नद्या, नाले, वाहिले़ विंधन विहिरी, विहीर, लघु, मध्यम प्रकल्पात पाणी असल्याने शेतीची कामे प्रगतीपथावर आहेत़ शेती कामासाठी महिला मजुरांना १५० ते २०० व पुरूषांना ३०० ते ४०० रूपये रोजगार असल्याने सरकारी कामाची मजुरांना आवश्यकता नसल्याचे चित्र आहे़ गावात कामे उपलब्ध असल्याने मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवली आहे.