शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

बिबट्याने उचलून नेलं अन् कवळा जीव घेतला...

By | Updated: November 28, 2020 04:11 IST

ग्राऊंड रिपोर्ट कडा (जि. बीड) : तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेंगा खात असलेल्या स्वराजवर झडप घातली आणि ...

ग्राऊंड रिपोर्ट

कडा (जि. बीड) : तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेंगा खात असलेल्या स्वराजवर झडप घातली आणि एकच आरडाओरडा झाला. शिवार सैरभैर झाले. स्वराजचे काका कृष्णा हिंगे, आजी मिरनबाई काकडे आणि आजूबाजूला असलेले गावकरी धावत सुटले. शिवारात कल्लोळ उठला. बिबट्याने स्वराजला तोंडात धरून धूम ठोकली खरी, पण जीवाच्या आकांताने मागे धावणारी माणसं बघून तो बावरला आणि त्याने स्वराजला रानात टाकून पळून गेला. दरम्यान त्याने स्वराजच्या नरडीचा घोट घेतला होता.

अख्खे गाव या घटनेने हादरले. गावात चूल पेटली नाही. साऱ्यांचे डोळे डबडबलेले. घरापुढे गावकऱ्यांची गर्दी जमली होती. स्वराजचे काका कृष्णा हिंगे सांगत होते ,‘उघड्या डोळ्यांनी घटना पाहताना जीव तिळतिळ तुटत होता. अघटित घडले.’ चिमुकला जीव डोळ्यादेखत गेला... ’असे सांगत त्याचे काका कृष्णा हिंगे यांनी अश्रुंना पुन्हा वाट करून दिली.

आजी मिरनबाईचे अश्रू खंडत नव्हते. माझा सोन्यासारखा नातू चिक्या माझ्याकडे आनंदात यायचा, राहायचा. मला सोडून जात नव्हता; पण आज माझ्यासमोर त्याला बिबट्याने उचलून नेले आणि कवळा जीव घेतला. काय म्हणला असेल माझ्या लेकराचा जीव, म्हणत त्यांनी फोडला

गावात आता घराच्या बाहेर निघावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात तर सोडाच; पण घराच्या बाहेर पडायचे म्हटले तरी आता नको बाबा, आपले घरातच बसा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थ बबन तरटे म्हणाले.

चौकट.....

चार दिवसांपूर्वी सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे यांचा बिबट्याने जीव घेतला. आज गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही गावातून पाहुण्याच्या चिमुकल्याचा बिबट्याने जीव घेतला. या भयानक प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून वनविभागाने आता नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांनी केली आहे.

● या गावात तत्काळ पिंजरा लावला असून औरंगाबाद, अमरावती, आष्टी, पाटोदा येथील टीम दक्ष झाल्या आहेत. त्याला पकडण्यासाठी वनविभाग सतर्क झाला असून लवकरच जेरबंद करू, असे आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

● वनविभागाने आता बिबट्याला पकडण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. आणखी मनुष्यबळ बोलवा. तो नरभक्षक बनला आहे. त्यामुळे त्याला तत्काळ जेरबंद करून येथील दहशत कमी करा, अशी सूचना विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली.