शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

बिबट्याने उचलून नेलं अन् कवळा जीव घेतला...

By | Updated: November 28, 2020 04:11 IST

ग्राऊंड रिपोर्ट कडा (जि. बीड) : तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेंगा खात असलेल्या स्वराजवर झडप घातली आणि ...

ग्राऊंड रिपोर्ट

कडा (जि. बीड) : तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेंगा खात असलेल्या स्वराजवर झडप घातली आणि एकच आरडाओरडा झाला. शिवार सैरभैर झाले. स्वराजचे काका कृष्णा हिंगे, आजी मिरनबाई काकडे आणि आजूबाजूला असलेले गावकरी धावत सुटले. शिवारात कल्लोळ उठला. बिबट्याने स्वराजला तोंडात धरून धूम ठोकली खरी, पण जीवाच्या आकांताने मागे धावणारी माणसं बघून तो बावरला आणि त्याने स्वराजला रानात टाकून पळून गेला. दरम्यान त्याने स्वराजच्या नरडीचा घोट घेतला होता.

अख्खे गाव या घटनेने हादरले. गावात चूल पेटली नाही. साऱ्यांचे डोळे डबडबलेले. घरापुढे गावकऱ्यांची गर्दी जमली होती. स्वराजचे काका कृष्णा हिंगे सांगत होते ,‘उघड्या डोळ्यांनी घटना पाहताना जीव तिळतिळ तुटत होता. अघटित घडले.’ चिमुकला जीव डोळ्यादेखत गेला... ’असे सांगत त्याचे काका कृष्णा हिंगे यांनी अश्रुंना पुन्हा वाट करून दिली.

आजी मिरनबाईचे अश्रू खंडत नव्हते. माझा सोन्यासारखा नातू चिक्या माझ्याकडे आनंदात यायचा, राहायचा. मला सोडून जात नव्हता; पण आज माझ्यासमोर त्याला बिबट्याने उचलून नेले आणि कवळा जीव घेतला. काय म्हणला असेल माझ्या लेकराचा जीव, म्हणत त्यांनी फोडला

गावात आता घराच्या बाहेर निघावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात तर सोडाच; पण घराच्या बाहेर पडायचे म्हटले तरी आता नको बाबा, आपले घरातच बसा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थ बबन तरटे म्हणाले.

चौकट.....

चार दिवसांपूर्वी सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे यांचा बिबट्याने जीव घेतला. आज गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही गावातून पाहुण्याच्या चिमुकल्याचा बिबट्याने जीव घेतला. या भयानक प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून वनविभागाने आता नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांनी केली आहे.

● या गावात तत्काळ पिंजरा लावला असून औरंगाबाद, अमरावती, आष्टी, पाटोदा येथील टीम दक्ष झाल्या आहेत. त्याला पकडण्यासाठी वनविभाग सतर्क झाला असून लवकरच जेरबंद करू, असे आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

● वनविभागाने आता बिबट्याला पकडण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. आणखी मनुष्यबळ बोलवा. तो नरभक्षक बनला आहे. त्यामुळे त्याला तत्काळ जेरबंद करून येथील दहशत कमी करा, अशी सूचना विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली.