शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

लिंबू, मिरचीचे भाव गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:58 IST

राजेश खराडे , बीड अत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे,

राजेश खराडे , बीडअत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे, शिवाय लिंबू या फळपिकाचेही दरवर्षीप्रमाणे यंदाही भाव गगनाला भिडले आहे. किलोवर विक्रीवर होणारे लिंबू आता नगावर आले आहे, तर मिरचीही शंभर रूपये किलोप्रमाणे विकली जात आहे.अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सर्व भाजीपाल्यांचे दर मध्यम स्वरूपाचे होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने मिरची, गवार, वांगे आदींची आवक घटली आहे, तर आष्टी आणि परळी वगळता इतर ठिकाणांहून लिंबाची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे ५ रूपयाला एक लिंबू मिळत आहे. जिल्ह्यात लिंबाच्या फळपिकाचे क्षेत्र १ हजार २१० हेक्टर असून, आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६० एवढे आहे, तर त्यापाठोपाठ परळी तालुक्यात १५० हेक्टरवर लागवड आहे.सर्वत्र कागदी लिंबे घेतली जात आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या मध्यावर लिंबाचे भाव वाढत असतात; मात्र यंदा उन्हाळा सुरू होताच भाव कडाडले आहेत. जागोजागी वाढलेले रसवंतीगृह, शीतपेय दुकानांमुळे लिंबाची मागणी वाढत आहे. येथील खासबागेतील आडत मार्केटमध्ये लिंबू फळपीक दाखल होण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी त्याची ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ केली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.दुसरीकडे मिरचीची लागवड ७५० हेक्टर असून, पाण्याअभावी हिरव्या मिरच्यांच्या भावाने शतक गाठले आहे, तर वाळलेल्या मिरच्या दोनशे रूपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत.उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पालेभाज्या आणि फळपिकांचे दर वाढले असून, आगामी काळातही यामध्ये भर पडणार असल्याचे येथील व्यापारी दिनकर काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.