शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

लिंबू, मिरचीचे भाव गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:58 IST

राजेश खराडे , बीड अत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे,

राजेश खराडे , बीडअत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे, शिवाय लिंबू या फळपिकाचेही दरवर्षीप्रमाणे यंदाही भाव गगनाला भिडले आहे. किलोवर विक्रीवर होणारे लिंबू आता नगावर आले आहे, तर मिरचीही शंभर रूपये किलोप्रमाणे विकली जात आहे.अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सर्व भाजीपाल्यांचे दर मध्यम स्वरूपाचे होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने मिरची, गवार, वांगे आदींची आवक घटली आहे, तर आष्टी आणि परळी वगळता इतर ठिकाणांहून लिंबाची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे ५ रूपयाला एक लिंबू मिळत आहे. जिल्ह्यात लिंबाच्या फळपिकाचे क्षेत्र १ हजार २१० हेक्टर असून, आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६० एवढे आहे, तर त्यापाठोपाठ परळी तालुक्यात १५० हेक्टरवर लागवड आहे.सर्वत्र कागदी लिंबे घेतली जात आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या मध्यावर लिंबाचे भाव वाढत असतात; मात्र यंदा उन्हाळा सुरू होताच भाव कडाडले आहेत. जागोजागी वाढलेले रसवंतीगृह, शीतपेय दुकानांमुळे लिंबाची मागणी वाढत आहे. येथील खासबागेतील आडत मार्केटमध्ये लिंबू फळपीक दाखल होण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी त्याची ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ केली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.दुसरीकडे मिरचीची लागवड ७५० हेक्टर असून, पाण्याअभावी हिरव्या मिरच्यांच्या भावाने शतक गाठले आहे, तर वाळलेल्या मिरच्या दोनशे रूपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत.उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पालेभाज्या आणि फळपिकांचे दर वाढले असून, आगामी काळातही यामध्ये भर पडणार असल्याचे येथील व्यापारी दिनकर काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.