शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

डावा कालवा उघडला

By admin | Updated: May 19, 2014 01:33 IST

औरंगाबाद : महापालिकेने सिडको-हडको पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची विस्कटलेली घडी बसविण्यास सुरुवात केलेली असताना जुन्या शहरात कमी दाबाने पाणी येत असल्याची ओरड सुरू झाली.

औरंगाबाद : महापालिकेने सिडको-हडको पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची विस्कटलेली घडी बसविण्यास सुरुवात केलेली असताना जुन्या शहरात कमी दाबाने पाणी येत असल्याची ओरड सुरू झाली. ती ओरड थांबविण्यासाठी मनपाने वेळापत्रकाचे पुन्हा मूल्यांकन करण्याची तयारी सुरू करताच जायकवाडीचा डावा कालवा १६ मेपासून उघडण्यात आला. त्यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे. अनेक वसाहतींमध्ये ४ तास उशिरा पाणी येत आहे. ३१ मेपर्यंत कालवा सुरू राहणार असून, जूनमध्येदेखील कालव्यातून पाणी सोडावे लागणार आहे. जायकवाडीत सध्या ९.४२ म्हणजेच २०० द.ल.घ.मी. इतका जिवंत जलसाठा आहे. ३१ जुलैपर्यंत हा साठा पुरेल. जायकवाडीच्या अभियंत्यांनी कालवा उघडण्याची माहिती पालिकेला न देताच लपून-छपून कालवा उघडला. त्यामुळे ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अ‍ॅप्रोच चॅनलचे काम केलेले असतानाही पालिकेच्या उपशावर परिणाम झाल्याने दोन दिवसांपासून शहरात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून शहरात पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब सुरू आहे. त्यासाठी पालिका पाणीपुरवठा विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, जलवाहिन्यांची गळती, कमी कर्मचारी आणि काही अधिकार्‍यांच्या मुजोरीमुळे हर्सूल आणि जायकवाडीत पाणी असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. कोटला कॉलनी, क्रांतीचौक आणि शहाबाजार येथील जलकुंभावरील वसाहतींना कमी दाबाने पाणी येत आहे. सिडको-हडकोला साडेतीन एमएलडी पाणी वाढवून दिले आहे. ९ मेपासून फारोळा येथे पाण्याचा पुन्हा वापर करून साडेतीन एमएलडी पाणी सिडकोतील वसाहतींसाठी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रक सुरळीत केल्याचा दावा केला असला तरी विजेअभावी अनेक भागांत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. जायकवाडीचे अभियंते म्हणतात... डावा कालवा १६ मेपासून सुरू आहे. एक आवर्तन द्यायचे होते. वरच्या धरणातून पाणी आले तर दुसरे आवर्तन लगेचच सोडण्यात येणार होते. मात्र, वरून पाणी आले नाही. ४मध्यंतरी पाऊस झाला. त्यामुळे दुसरे आवर्तन धरणातून देण्याची गरज पडली नाही. त्यानंतर कालव्यालगतच्या शेतकर्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी केली. प्रत्येक १० कि़ मी. वरील सी. आर. गेटजवळ कालवा अडवून शेती, विहिरी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कालवा उघडण्यात आला आहे. २०८ कि़ मी. अंतराचा डावा कालवा आहे. ४२ ते ३ मीटरपर्यंत पाण्याची खोली निर्माण होण्यापर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. तर काही तरी फायदा होईल, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने पाणी सोडण्यास परवानगी दिल्यानंतर कालवा उघडण्यात आला. लपून-छपून कालवा उघडलेला नाही, असे जायकवाडीचे सहायक अभियंता के. एम. हिरे यांनी सांगितले. महापालिकेचे मत असे १६ मे रोजी रात्रीतून अचानक कालवा सुरू झाला. पालिकेला त्याची माहिती नव्हती. त्यामुळे पंपिंगवर परिणाम झाला. शहरावर त्याचा परिणाम झालेला नाही. पंपिंग स्टेशनवर यंत्रणा राबविल्यामुळे जास्त परिणाम झाला नाही. सध्या पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा उपअभियंता यू. जी. शिरसाठ यांनी केला. हर्सूलचे पाणी चालले कुठे हर्सूलच्या तलावात सध्या १६ फूट पाणी आहे. प्रभाग ‘अ’ व ‘क’ मधील सुमारे ३० वॉर्डांना हर्सूलचे पाणी पुरविले जात आहे. रोज १० एमएलडी पाणी तलावातून उपसले जात आहे. त्यामुळे जायकवाडीवरून ६९ वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. हर्सूलमुळे मनपावरील खूप मोठा ताण हलका झालेला असताना शहरात पाणी कमी पडते का? असा सवाल पुढे येतो आहे. सिडको-हडकोला सध्या २६ एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामध्ये आणखी साडेतीन एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्यासाठी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर सुरू केला आहे. जायकवाडीतून येणार्‍या रॉ वॉटरमध्ये केमिकल टाकले जाते. त्यानंतर पाणी शुद्ध होते. या प्रक्रियेत बरेच पाणी वाहून जाते. ते पाणी पुन्हा प्रक्रियेत घेऊन शुद्ध करून वापरात घेतले जात आहे. त्यामुळे सिडको सध्या बर्‍यापैकी पाणीपुरवठा होतो आहे.