शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

जालना :कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर अंधारमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस लिमीटेड कंपनीमार्फत एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन केले. लोकप्रतिनिधींचा हस्ते या कामाचे अधिकृत उदघाटनही झाले. मात्र, कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे. महावितरणचे चौदा कोटींचे वीज बिल थकल्यामुळे शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद आहेत. अभय योजनेचा लाभ घेत पालिकेने तीन टप्प्यांत पाच कोटींचे वीजबिल भरले असले तरी पालिकेकडे अद्याप दहा कोटींची थकबाकी आहे. असे असताना शहरातील बंद पथदिवे पुन्हा सुरू करणे व वीज बिलात बचत करण्यासाठी पालिकेने एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस दिल्ली या कंपनीमार्फत शहरात नवीन तेरा हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन केले. सप्टेंबर २०१६ मध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत मामा चौकातून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली. मात्र, तीनशे पथदिवे बसविल्यानंतर कंपनीने पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर करारनामा ठेवला. करारनाम्यात एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत इइएसएल कंपनीला अनामत म्हणून देण्यात यावी. एलईडी दिव्यांची सात वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चासह अन्य अटींचा समावेश आहे. इइएसएल कंपनीच्या या अटींना नगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे कंपनीने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम थांबविले. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.