शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

जालना :कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर अंधारमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस लिमीटेड कंपनीमार्फत एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन केले. लोकप्रतिनिधींचा हस्ते या कामाचे अधिकृत उदघाटनही झाले. मात्र, कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे. महावितरणचे चौदा कोटींचे वीज बिल थकल्यामुळे शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद आहेत. अभय योजनेचा लाभ घेत पालिकेने तीन टप्प्यांत पाच कोटींचे वीजबिल भरले असले तरी पालिकेकडे अद्याप दहा कोटींची थकबाकी आहे. असे असताना शहरातील बंद पथदिवे पुन्हा सुरू करणे व वीज बिलात बचत करण्यासाठी पालिकेने एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस दिल्ली या कंपनीमार्फत शहरात नवीन तेरा हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन केले. सप्टेंबर २०१६ मध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत मामा चौकातून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली. मात्र, तीनशे पथदिवे बसविल्यानंतर कंपनीने पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर करारनामा ठेवला. करारनाम्यात एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत इइएसएल कंपनीला अनामत म्हणून देण्यात यावी. एलईडी दिव्यांची सात वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चासह अन्य अटींचा समावेश आहे. इइएसएल कंपनीच्या या अटींना नगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे कंपनीने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम थांबविले. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.