शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

जालना :कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर अंधारमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस लिमीटेड कंपनीमार्फत एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन केले. लोकप्रतिनिधींचा हस्ते या कामाचे अधिकृत उदघाटनही झाले. मात्र, कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे. महावितरणचे चौदा कोटींचे वीज बिल थकल्यामुळे शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद आहेत. अभय योजनेचा लाभ घेत पालिकेने तीन टप्प्यांत पाच कोटींचे वीजबिल भरले असले तरी पालिकेकडे अद्याप दहा कोटींची थकबाकी आहे. असे असताना शहरातील बंद पथदिवे पुन्हा सुरू करणे व वीज बिलात बचत करण्यासाठी पालिकेने एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस दिल्ली या कंपनीमार्फत शहरात नवीन तेरा हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन केले. सप्टेंबर २०१६ मध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत मामा चौकातून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली. मात्र, तीनशे पथदिवे बसविल्यानंतर कंपनीने पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर करारनामा ठेवला. करारनाम्यात एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत इइएसएल कंपनीला अनामत म्हणून देण्यात यावी. एलईडी दिव्यांची सात वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चासह अन्य अटींचा समावेश आहे. इइएसएल कंपनीच्या या अटींना नगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे कंपनीने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम थांबविले. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.