शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:27 IST

जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देधरणात ८७.६१ टक्के साठा

पैठण (जि. औरंगाबाद) :  जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.औरंगाबाद शहर व जायकवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जायकवाडीच्या जलसाठ्यात  गेल्या २४ तासात जवळपास एक टीएमसीने  वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभर धरणात १०४१३ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. धरणाचा जलसाठा ८७.६१ टक्के एवढा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त सव्वादोन फूट बाकी आहे. यामुळे धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्यास धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागणार आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीची सोमवारी सायंकाळी पाणीपातळी १५१९.६८ फूट एवढी झाली होती.धरणात एकूण जलसाठा २६४०.२११ दलघमी (९३.२२ टीएमसी) तर जिवंत जलसाठा १९०२.१०५ दलघमी (६७.१६ टीएमसी) एवढा झाला आहे. १ जून २०१७ पासून धरणात ६४.७३ टीएमसी पाण्याची आवक झाली असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक व नगर जिल्ह्यातून येणारी आवक बंद असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणातील जलसाठ्यात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने भर पडत आहे. भारतीय हवाामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास नाशिक व नगर जिल्ह्यातून धरणात मोठी आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बनसोड व धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी केले आहे.तहसील प्रशासनाची बैठकसोमवारी पैठणच्या तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापनाची तातडीने बैठक घेतली; परंतु या बैठकीबाबत पत्रकार वा लोकप्रतिनिधी यांना कुठलीच कल्पना दिली नाही. त्यामुळे या बैठकीत काय ठरले, हे समजू शकले नाही.