शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:27 IST

जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देधरणात ८७.६१ टक्के साठा

पैठण (जि. औरंगाबाद) :  जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.औरंगाबाद शहर व जायकवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जायकवाडीच्या जलसाठ्यात  गेल्या २४ तासात जवळपास एक टीएमसीने  वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभर धरणात १०४१३ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. धरणाचा जलसाठा ८७.६१ टक्के एवढा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त सव्वादोन फूट बाकी आहे. यामुळे धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्यास धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागणार आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीची सोमवारी सायंकाळी पाणीपातळी १५१९.६८ फूट एवढी झाली होती.धरणात एकूण जलसाठा २६४०.२११ दलघमी (९३.२२ टीएमसी) तर जिवंत जलसाठा १९०२.१०५ दलघमी (६७.१६ टीएमसी) एवढा झाला आहे. १ जून २०१७ पासून धरणात ६४.७३ टीएमसी पाण्याची आवक झाली असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक व नगर जिल्ह्यातून येणारी आवक बंद असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणातील जलसाठ्यात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने भर पडत आहे. भारतीय हवाामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास नाशिक व नगर जिल्ह्यातून धरणात मोठी आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बनसोड व धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी केले आहे.तहसील प्रशासनाची बैठकसोमवारी पैठणच्या तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापनाची तातडीने बैठक घेतली; परंतु या बैठकीबाबत पत्रकार वा लोकप्रतिनिधी यांना कुठलीच कल्पना दिली नाही. त्यामुळे या बैठकीत काय ठरले, हे समजू शकले नाही.