शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

उत्पन्न सोडाच; लागवडीचा निम्मा खर्चही निघेना

By admin | Updated: December 2, 2014 00:45 IST

संतोष धारासूरकर , जालना दुष्काळपाठोपाठ गारपिटीचा मोठा तडाखा सहन केलेल्या या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यावर्षी म्हणजे यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे

संतोष धारासूरकर , जालनादुष्काळपाठोपाठ गारपिटीचा मोठा तडाखा सहन केलेल्या या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यावर्षी म्हणजे यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे सोयाबीन या प्रमुख पिकाच्या लागवडीसह फवारणी व काढणी पर्यंतचा निम्मा खर्च सुद्धा पदरात पडला नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.गेल्या चार सहा वर्षांपासून या जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. विशेषत: नगदी पीक म्हणूनच सोयाबीनकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. याही वर्षी सोयाबीनचे लागवड क्षेत्र लक्षणीय होते.जिल्ह्यात एक लाख ९ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली. ती सुद्धा मोठ्या उमेदीने. कारण गेल्या दोन वर्षापूवी आवर्षणामुळेच कोरडवाहू शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळ अनुभवला. त्यापाठोपाठ गेल्यावर्षी गारपिटीच्या तडाख्याने शेतकरी कोलमडला. तिसऱ्या वर्षी म्हणजे यावर्षी त्या दोन वर्षांचा खर्चाचा ताळेबंद बसवू म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्यांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मोठ्या उमेदीने, सोयाबीनची लागवड केली. तत्पूर्वी बँकांकडून, खाजगी सावकारांकडून कर्ज उचलून महागड्या बी- बियाणांची खरेदी केली. पेरणीपूर्व मशागत, उन्हाळी पाळ्या, पेरणीपूर्व पाळी व प्रत्यक्ष पेरणीसाठीही मोठा खर्च केला. महागडी बी- बियाणे पाठोपाठ डीएपी खते, त्यापाठोपाठ तणनाशक, किडीच्या दोन- चार फवारण्या, दोन वेळा कोळपणी, तसेच तणनाशकांसाठी फवारणी व खुरपणीसाठीही पाण्यासारखा खर्च केला. तेथून लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा सर्वसाधारण प्रतिएकरी सर्व साधारण खर्च, उतारा व प्रति क्विंटल सोयाबीनला मिळणारा भाव याचा ताळेबंद सहजपणे पडताळ्यास या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी लागवडीपासून काढणीपर्यंतचा निम्मा खर्च सुद्धा पडला नाही, असै दुर्दैवी चित्र समोर आले आहे. अशा परिस्थतीतही शासनाकडून शेतकऱ्यांचा चेष्ठा सुरु आहे. वस्तूनिष्ठ आणेवारी ऐवजी अनेक ठिकाणी जुजबी कामे करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.४गेल्यावर्षी या जिल्ह्यात १ लाख ९ हजार ८१५ हेक्टर सोयाबीनचे लागवड क्षेत्र होते. प्रति हेक्टरी उतारा १५ ते १७ क्विंटल एवढा होता. यावर्षी क्षेत्र फारसे घटले नाही. परंतु उतारा प्रति हेक्टरी चार ते पाच क्विंटल एवढाच सर्वसाधारणपणे आला आहे. म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक प्रति हेक्टरी उताऱ्यात घट आली आहे. ४यावर्षी एकरी एका कट्टयापासून (५५ किलो) सर्व साधारणपणे तीन ते चार कट्ट्यांपर्यंत सोयाबीनचा उतारा आला आहे. तीन कट्टे म्हणजे सर्व साधारण दीड क्विंटल प्रति एकरी उत्पादनही आहे. जालनासह अन्यत्र मार्केट यार्डात सोयाबीनला सर्वसाधारणपणे ३२०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळतो आहे. एकूण प्रति हेक्टरी सर्वसाधारण ११ ते १२ हजार रुपये खर्च असताना शेतकऱ्यांच्या पदरात चार ते सहा हजार रुपयेच पडत आहेत. म्हणजे निम्मा खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. पेरणीपूर्व मशागत- (उन्हाळी पाळ्या दोन, पेरणीपूर्व पाळी एक व प्रत्यक्षपेरणी) - १५०० रुपये ४बियाणे खरेदी- एक बॅग(३० किलो) - २५०० रुपये४खते- डीएपी (बियांबरोबर खतपेरा) - १२५० रुपये४तणनाशक- (पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांत फवारणीसह) १००० रुपये४अळीसाठी फवारणी ( पहिल्या २५ दिवसांच्या आत) - ७०० ते ८०० रुपये४फवारणी (अळीसाठी दुसऱ्यांदा फुलोरा अवस्थेत)- १००० रुपये४फवारणी (शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत)- ७०० ते८०० रुपये४कोळपणी (फवारण्यानंतर सर्व साधारणपणे दोन वेळा) - ४०० ते ५०० रुपये४तणनाशक (यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे तणनाशकासाठी जादा खुरपणी करावी लागली) - १२०० रुपये४काढणी प्रति एकरी - १९०० ते २२०० रुपये४मळणीयंत्र- ७० ते १०० रुपये कट्टयाप्रमाणे खर्च