शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जायकवाडी जलवाहिनीला गळती

By admin | Updated: January 15, 2016 00:21 IST

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह तसेच पाईपच्या जॉइंटमधून गळती होत असल्याचे आढळून आले आहे. शहराची पाणीटंचाई कामयस्वरूपी निकाली निघावी म्हणून दोन वर्षांपूर्वी सुमारे दोनशे कोटी रूपये खर्च करून ८० किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. सुरूवातीला काही महिने पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सद्यस्थितीत असंख्य ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे. यात अंबडपासून पाहिल्यास अंबड येथील जय भवानी मंगल कार्यालयाजवळ, लालवाडी फाटा, पारनेर फाटा, गोलापांगरी जवळ चार ते पाच ठिकाणी तर मठपिंपळगावजवळही मोठी गळती सुरू आहे. काजळा फाट्यावर गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. इंदेवाडी परिसर, जिल्हा कारागृह परिसरातून पाण्याची नासाडी होते आहे. बहुतांश ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरूस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईपच्या जॉइंटमधूनही पाणी गळती होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जलवाहिनी कंत्राटदरामार्फत तयार केली. त्यामुळे ही जवाहिनी दुरूस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉल्व्ह दुरूस्तीमुळे जुना जालना भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. परिणामी या भागातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. ८० किलोमीटरच्या अंतरावर शेकडो ठिकाणी गळतीमुळे शहागड- जालना जलवाहिनीसारखी स्थिती होते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहागड जलवाहिनीचीही देखरेखीअभावी चाळणी झाली होती. काही शेतकऱ्यांनीही ही जलवाहिनी फोडून पाणी वळविले होते. काही ठिकाणी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. वास्तविक पाहता खडक फोडून भूमिगत जलवाहिनी अंथरणे गरजेचे होते. संबंधित कंत्राटदाराने ही जलवाहिनी जमिनीवर ठेवल्याने जॉइंटमधून पाणी वाहून जात आहे. उच्च दाबामुळे या जलवाहिनीतून चोवीस तास पाणी वाहत असते. अनेकदा व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो. आगामी उन्हाळा पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या जलवाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दुरूस्ती केल्यास वाहून जाणारे लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. (प्रतिनिधी)