शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

जायकवाडी जलवाहिनीला गळती

By admin | Updated: January 15, 2016 00:21 IST

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह तसेच पाईपच्या जॉइंटमधून गळती होत असल्याचे आढळून आले आहे. शहराची पाणीटंचाई कामयस्वरूपी निकाली निघावी म्हणून दोन वर्षांपूर्वी सुमारे दोनशे कोटी रूपये खर्च करून ८० किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. सुरूवातीला काही महिने पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सद्यस्थितीत असंख्य ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे. यात अंबडपासून पाहिल्यास अंबड येथील जय भवानी मंगल कार्यालयाजवळ, लालवाडी फाटा, पारनेर फाटा, गोलापांगरी जवळ चार ते पाच ठिकाणी तर मठपिंपळगावजवळही मोठी गळती सुरू आहे. काजळा फाट्यावर गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. इंदेवाडी परिसर, जिल्हा कारागृह परिसरातून पाण्याची नासाडी होते आहे. बहुतांश ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरूस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईपच्या जॉइंटमधूनही पाणी गळती होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जलवाहिनी कंत्राटदरामार्फत तयार केली. त्यामुळे ही जवाहिनी दुरूस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉल्व्ह दुरूस्तीमुळे जुना जालना भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. परिणामी या भागातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. ८० किलोमीटरच्या अंतरावर शेकडो ठिकाणी गळतीमुळे शहागड- जालना जलवाहिनीसारखी स्थिती होते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहागड जलवाहिनीचीही देखरेखीअभावी चाळणी झाली होती. काही शेतकऱ्यांनीही ही जलवाहिनी फोडून पाणी वळविले होते. काही ठिकाणी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. वास्तविक पाहता खडक फोडून भूमिगत जलवाहिनी अंथरणे गरजेचे होते. संबंधित कंत्राटदाराने ही जलवाहिनी जमिनीवर ठेवल्याने जॉइंटमधून पाणी वाहून जात आहे. उच्च दाबामुळे या जलवाहिनीतून चोवीस तास पाणी वाहत असते. अनेकदा व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो. आगामी उन्हाळा पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या जलवाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दुरूस्ती केल्यास वाहून जाणारे लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. (प्रतिनिधी)