शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

आघाडीचा धर्म आम्हाला शिकवू नये

By admin | Updated: July 26, 2014 01:08 IST

नांदेड: आघाडी शासनाने राज्यात विकासाची अनेक कामे केली आहेत़ परंतु केलेल्या कामांचे मार्केटींग करण्यात आम्ही कमी पडलो़ आघाडीचा धर्म पाळत गेली पाच वर्ष अन्याय खपवून घेतला़

नांदेड: आघाडी शासनाने राज्यात विकासाची अनेक कामे केली आहेत़ परंतु केलेल्या कामांचे मार्केटींग करण्यात आम्ही कमी पडलो़ आघाडीचा धर्म पाळत गेली पाच वर्ष अन्याय खपवून घेतला़ त्यामुळे आघाडीचा धर्म पाळण्याचे कुणी आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करुन नये असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगाविला़ नांदेडातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते़ तटकरे म्हणाले, आम्हाला जातीयवादी सरकार निवडून आणायचे नाही़ त्यामुळे मित्रपक्षाने आम्हाला कमकुवत, दुबळे समजू नये़ लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होवू नये याचीही कार्यकर्त्यांनी पुरेपूर खबरदारी घेण्याची गरज आहे़ येत्या १५ ते १७ आॅगस्टला निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे़ समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीला अधिक जागा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु़ परंतु कार्यकर्त्यांनीही मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे़ मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे असेही त्यांनी ठासून सांगितले़ मोदी सरकारने जनतेला अच्छे दिन येणार असल्याची स्वप्ने दाखविली़ परंतु पेट्रोल, डिझेल, रेल्वे अशा सर्वच दरांमध्ये वाढ केली़ शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णयही घेण्यात आले नाही असे म्हणत कृषी मंत्र्यांचे नावही अनेकांना माहित नसल्याचे ते म्हणाले़ शरद पवार कृषीमंत्री असताना शेतमालाच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या होत्या़ त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला़ परंतु यंदा केंद्रशासनाने आधाभूत किमतीमध्ये एक टक्काही वाढ केली नाही़ यापूर्वीच्या शासनाने राबविलेल्या योजनांवरच अन्नधान्याबाबत आपण स्वंयपूर्ण झालो असून या शासनाचे कर्तृत्व काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगांवकर, माजी खाग़ंगाधरराव कुंटूरकर, गणेशराव दुधगांवकर, आ़प्रदीप नाईक, आ़शंकरअण्णा धोंडगे, आ़विक्रम काळे, माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, रामनारायण काबरा, कल्पना डोंगळीकर, निरीक्षक तोताराम कायंदे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)बाभळीसाठी पुन्हा न्यायालयात जाणार-उपमुख्यमंत्रीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ३० जून रोजी बाभळीचे दरवाजे उघडण्यात आले़ परंतु त्यामुळे आजपर्यंत साठविलेले सर्व पाणी आंध्रात गेले असून परिसरात पिण्यासाठी सुद्धा पाणी राहिले नाही़ पाऊस पडला नाही किंवा इतर परिस्थिती ओढविल्यास दरवाजे खाली ठेवावे की वर? याबाबत कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेवून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठाविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले़ महाराष्ट्र सदनातील प्रकाराबद्दल त्यांनी शिवसेनेच्या खासदारांवर शिस्तीचे संस्कार केले नसून कशाची एवढी मस्ती आली त्यांना असा प्रश्न उपस्थित केला़ सभागृहात शिवसेनेची केवीलवाणी अवस्था असून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून लोकांच्या भावनांना हात घालून मते मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ जैतापूरला विरोध करतात परंतु त्यांच्याच मित्रपक्षाचे पंतप्रधान जैतापूर प्रकल्प झालाच पाहिजे अशी भूमिका घेतात़ जागावाटपाबाबत त्यांनी शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करीत जागा वाढवून मिळण्याबाबत मात्र आग्रही असल्याचे सांगितले़ परंतु कार्यकर्त्यांनीही गाफील राहू नये असा सल्ला त्यांनी दिला़ ओबीसीचे राज्यातील मोठे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कारला नुसता धक्का लागला़ त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला़ अशा मोठ्या नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो़ परंतु त्यांच्या घटनेनंतर इतकी घाई गडबड का करण्यात आली़ त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे आपले मत असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले़