शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दिग्गज् नेतृत्व हरपले..

By admin | Updated: February 17, 2015 00:38 IST

आदर्श लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला स्वच्छ, संवेदनशील लोकनेता हरपला ! संवेदनशील, विनम्र व अभ्यासू नेत्याला राज्य मुकले

४आर. आर. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते एक अभ्यासू आणि संवेदनशील आणि विनम्र असे नेते होते. जि, प. सदस्य, आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी त्यांची चढती कारकिर्द होती. सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते म्हणून मंत्रिमंडळात ते परिचित असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल आपलेपणा होता. त्यांनी संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरु करुन अंमलात आणली होती. ते राज्याच्या कायम स्मरणात राहतील. - माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख. आर. आर. पाटील यांच्या निधनाने आदर्श लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. ते महाराष्ट्राचे आबा होते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करीत होता. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता. ते समाजकारणी होते. राजकारणात अनेक विधायक गोष्टी त्यांनी केल्या. स्वच्छता योजना अनेक गावात स्वच्छतेचा तर तंटामुक्तीतून तंटामुक्तीचा वसा दिला. - माजी खासदार जनार्दन वाघमारे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय राजकारणी म्हणून आर. आर. पाटील सर्वपरिचित होते. स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक माणूस म्हणून त्यांनी आपली प्रतिमा आयुष्यभर जपली. साहेबांबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. आमचे घरगुती संबंध होते. अनेक वेळा आम्ही सुखदु:ख एकत्र पाहिले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक दिग्गज् नेतृत्व, फर्डा वक्ता, स्वच्छ आणि कल्पक नेता हरपला आहे. - आ. अमित देशमुखलातूर : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या जाण्याने राज्यातील लोकनेता हरपला अशा शब्दात लातुरकरांनी श्रध्दांजली अर्पण केली. सोमवारी विविध पक्ष-संघटनांच्या वतीने आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.सामान्यांचे लोकनेतेसामान्यांचे असामान्य लोकनेते आबा होते. ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान अशा महत्वपूर्ण योजना राज्याला देणारे नेतृत्व हरवले आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी आर.आर. पाटलांची होती. त्यामुळेच ते लोकप्रिय झाले. -आमदार विक्रम काळे आर. आर. पाटील यांच्या रुपाने राज्यातील अस्सल मातीतल्या नेतृत्वाने राज्यातील जनतेला अलविदा केला आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. तासगावसारख्या गावातून पुढे येत आर. आर. पाटील यांनी वक्तृत्व आणि ग्रामस्वच्छतेसारख्या योजनांमधून आपली राज्यावर छाप सोडली होती. - माजी आमदार वैजनाथ शिंदे सामान्य जनतेचा आधारवड हरपलाराज्यातील सर्वसामान्य जनतेचा आधारवड आर. आर. पाटील यांच्या जाण्याने हरपला आहे. त्यांनी पक्षाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांच्या जाण्याने पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. - डी. एन. शेळके, जिल्हाध्यक्ष, राकाँ.