शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

पुढाऱ्यांची लगीनघाई सुरू

By admin | Updated: September 13, 2014 23:28 IST

जालना : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाल्यापाठोपाठ या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत:ढवळून निघाले आहे.

जालना : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाल्यापाठोपाठ या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत:ढवळून निघाले आहे. आता संपूर्ण महिना मोर्चेबांधणीसह डावपेच व प्रचाराच्या धुराळ्याने न्हाहून निघणार असे चित्र आहे. गेल्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. तेंव्हापासूनच या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रास विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. विशेषत: जिल्ह्यातील मात्तबर पुढाऱ्यांनी जय-पराजयाचे विश्लेषण, आत्मपरीक्षण करीत विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली. एकेक दिवस महत्वाचा आहे, हे ओळखून या पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्या दीड दोन महिन्यांपासून विविध विकास कामांच्या भूमिपूजनांसह उद्घाटने व लोकार्पण सोहळ्याचा धूमधडका लावला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकले हे ओळखून या मात्तबर पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शेकडो कार्यक्रमे ओटोपली. शासकीय योजनांचा शुभारंभ,उद्घाटने वगैरे कार्यक्रमांना अक्षरश: राजकीय स्वरुप आले होते. गंमत म्हणजे पुढाऱ्यांनी या कार्यक्रमांतून सत्तारुढ स्थानिक विरोधक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना पद्धतशीपणे दूर ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे विरोधकांनी सुद्धा पुन्हा कार्यक्रम घेऊन एकाच गोष्टीचा दोन वेळा सोहळे आटोपून सर्व सामान्य नागरिकांना आचंबित केले. त्याही पलिकडे म्हणजे काही कार्यक्रमांमधून शासकीय यंत्रणेलाच कोणताच सहभाग नव्हता. हे विशेष.या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून आज ना उद्या आचारसंहिता लागणार म्हणून जिल्ह्यातील पुढारी प्रत्येक तासाचा सदोपयोग व्हावा म्हणून दंग होते. शासकीय कार्यालयांमधून वेगवेगळे प्रस्ताव मंजुरीपासून कामांच्या आदेशासाठी लोकप्रतिनिधींनी चढाओढ सुरु केली. त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण यंत्रणा सुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून कामे आटोपण्यात व्यस्त होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सविस्तर कार्यक्रम पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्यापाठोपाठ जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र अक्षरश: सतर्क झाले. कपड्यांवरील धूळ झटकून कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाऱ्यांचे बंगले गाठले. हितगुज सुरु केले. तर सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने बैठकांचे सत्र सुरु केले. एकूण प्रचाराचा कालावधी ओळखून रात्री उशिरापर्यंत मोजक्याच विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर पुढाऱ्यांनी राणनीती आखण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत प्रबळ दावेदार असणारे उमेदवार आपापल्या कार्यक्षेत्रात दिवसभर ठाण मांडून होते. आता एक तास सुद्धा वाया घालायचा नाही असा संकल्प या मात्तबरांनी सोडला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर जिल्ह्यातील पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तपशील गोळा केला. अवघ्या महिनाभरातच निवडणुकीचे सर्व सोपस्कार पार पडणार आहेत.४हे ओळखून कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर प्रचारास अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी ओळखून मात्तबर पुढारी बुचकळ्यात पडले. ४दिवाळी पूर्वीच निवडणुका होणार आहेत. मतदानापाठोपाठ मतमोजणीही होणार असल्याने दिवाळी आनंद साजरी करता येणार असल्याने कार्यकर्ते सुखावले आहेत.४ तसेच पंधरा दिवसांतच प्रचार आटोपणार असल्याने पुढारीही खऱ्या अर्थाने सुखावले आहेत. वरकरणी ते अपुरा वेळ मिळत असल्याचे तक्रार करीत आहेत.