शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुढाऱ्यांची लगीनघाई सुरू

By admin | Updated: September 13, 2014 23:28 IST

जालना : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाल्यापाठोपाठ या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत:ढवळून निघाले आहे.

जालना : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाल्यापाठोपाठ या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत:ढवळून निघाले आहे. आता संपूर्ण महिना मोर्चेबांधणीसह डावपेच व प्रचाराच्या धुराळ्याने न्हाहून निघणार असे चित्र आहे. गेल्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. तेंव्हापासूनच या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रास विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. विशेषत: जिल्ह्यातील मात्तबर पुढाऱ्यांनी जय-पराजयाचे विश्लेषण, आत्मपरीक्षण करीत विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली. एकेक दिवस महत्वाचा आहे, हे ओळखून या पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्या दीड दोन महिन्यांपासून विविध विकास कामांच्या भूमिपूजनांसह उद्घाटने व लोकार्पण सोहळ्याचा धूमधडका लावला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकले हे ओळखून या मात्तबर पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शेकडो कार्यक्रमे ओटोपली. शासकीय योजनांचा शुभारंभ,उद्घाटने वगैरे कार्यक्रमांना अक्षरश: राजकीय स्वरुप आले होते. गंमत म्हणजे पुढाऱ्यांनी या कार्यक्रमांतून सत्तारुढ स्थानिक विरोधक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना पद्धतशीपणे दूर ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे विरोधकांनी सुद्धा पुन्हा कार्यक्रम घेऊन एकाच गोष्टीचा दोन वेळा सोहळे आटोपून सर्व सामान्य नागरिकांना आचंबित केले. त्याही पलिकडे म्हणजे काही कार्यक्रमांमधून शासकीय यंत्रणेलाच कोणताच सहभाग नव्हता. हे विशेष.या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून आज ना उद्या आचारसंहिता लागणार म्हणून जिल्ह्यातील पुढारी प्रत्येक तासाचा सदोपयोग व्हावा म्हणून दंग होते. शासकीय कार्यालयांमधून वेगवेगळे प्रस्ताव मंजुरीपासून कामांच्या आदेशासाठी लोकप्रतिनिधींनी चढाओढ सुरु केली. त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण यंत्रणा सुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून कामे आटोपण्यात व्यस्त होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सविस्तर कार्यक्रम पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्यापाठोपाठ जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र अक्षरश: सतर्क झाले. कपड्यांवरील धूळ झटकून कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाऱ्यांचे बंगले गाठले. हितगुज सुरु केले. तर सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने बैठकांचे सत्र सुरु केले. एकूण प्रचाराचा कालावधी ओळखून रात्री उशिरापर्यंत मोजक्याच विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर पुढाऱ्यांनी राणनीती आखण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत प्रबळ दावेदार असणारे उमेदवार आपापल्या कार्यक्षेत्रात दिवसभर ठाण मांडून होते. आता एक तास सुद्धा वाया घालायचा नाही असा संकल्प या मात्तबरांनी सोडला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर जिल्ह्यातील पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तपशील गोळा केला. अवघ्या महिनाभरातच निवडणुकीचे सर्व सोपस्कार पार पडणार आहेत.४हे ओळखून कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर प्रचारास अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी ओळखून मात्तबर पुढारी बुचकळ्यात पडले. ४दिवाळी पूर्वीच निवडणुका होणार आहेत. मतदानापाठोपाठ मतमोजणीही होणार असल्याने दिवाळी आनंद साजरी करता येणार असल्याने कार्यकर्ते सुखावले आहेत.४ तसेच पंधरा दिवसांतच प्रचार आटोपणार असल्याने पुढारीही खऱ्या अर्थाने सुखावले आहेत. वरकरणी ते अपुरा वेळ मिळत असल्याचे तक्रार करीत आहेत.