शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली. मसाप कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन डिसेंबर २०१४ मध्ये उदगीर येथे होणार असून, त्याच्या तारखा संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके हे निश्चित करून लवकरच घोषित करतील. यावेळी कुंडलिक अतकरे, देवीदास कुलकर्णी, श्याम देशपांडे, भारत सासणे, प्रा. ललिता गादगे, डॉ. जगदीश कदम, रसिका देशमुख, प्रकाश त्रिभुवन, प्रा. भास्कर बडे, प्रा. विलास वैद्य आदींची उपस्थिती होती. संमेलनाध्यक्षांचा अल्पपरिचय1लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ‘इन्किलाबविरुद्ध जिहाद’, ‘अंधेरनगरी’ आणि ‘आक्टोपस’ या तीन कादंबऱ्या, ‘सलोमी’ व ‘दौलत’ या दोन लघुकादंबऱ्या, ‘पाणी-पाणी’, ‘नंबर वन’, ‘आंतरीच्या गूढगर्भी’, ‘अग्निपथ’, ‘कथांजली’ आणि ‘ सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हे चार कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या कादंबऱ्यातून वेगळे विषय हाताळले असून चटका लावणारे लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासन, मसाप, महाराष्ट्र साहित्य परिषद व इतर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. 2देशमुख यांनी महाराष्ट्र व भारतीय प्रशासन सेवेंतर्गत उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केले असून सध्या ते मुंबईत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. एकमुखी निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही सतत वादाचा विषय ठरत असताना आज मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमुखी व कोणताही वादविवाद न होता करण्यात आली. विशेष म्हणजे ३५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी देशमुख यांचे नाव सुचविले व त्यावरच सर्वांनी शिक्कामोर्तब केले. अन्य कुणाचेही नाव समोर आले नाही. गतवर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष सासणे हे प्रशासकीय अधिकारी होते व नियोजित संमेलनाचे अध्यक्षही योगायोगाने प्रशासकीय अधिकारी आहेत.