शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

विधि विद्यापीठ जूनपासून नाहीच

By admin | Updated: April 17, 2016 01:36 IST

औरंगाबाद : मागील दहा वर्षांपासून चालू असलेली औरंगाबादेतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाची चर्चा यापुढेही चालूच राहणार असून,

औरंगाबाद : मागील दहा वर्षांपासून चालू असलेली औरंगाबादेतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाची चर्चा यापुढेही चालूच राहणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०१६) ते सुरू होण्याची अपेक्षाही मावळली आहे. एखादी गोष्ट मराठवाड्याला मिळायची असल्यास तिला किती विलंब होतो याचे हे विधि विद्यापीठ उत्तम उदाहरण ठरावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मूळ मराठवाड्याची मागणी असलेले राष्ट्रीय विधि विद्यापीठ औरंगाबादेत सुरू करण्याची घोषणा २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात करण्यात आली. २० आॅगस्ट २००९ रोजी हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायम करण्यात आला. यासाठी औरंगाबादेत करोडी येथे २० हेक्टर जागाही मंजूर करण्यात आली. मात्र, त्यानंतर हा विषय सातत्याने प्रलंबित राहिला. औरंगाबादला राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा विषय बाजूला पडून मुंबई आणि नागपूर येथे विधि विद्यापीठासाठी कुलपतींची नियुक्तीही झाली आहे. मुंबईचे विधि विद्यापीठ सुरू झाले आहे, तर नागपूरचे जून २०१६ पासून सुरू होणार आहे. औरंगाबाद येथे विधि विद्यापीठ सुरू होत नसल्याचे पाहून हा विषय न्यायालयात गेला आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०१२-१३ मध्ये औरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू होईल, (पान १ वरून) असे आश्वासन दिले होते. मात्र, हे विद्यापीठ सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी यासंदर्भात अवमान याचिका दाखल केली आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अवमान याचिका मुंबई येथील मुख्य खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागण्याचीही प्रतीक्षा आहे. औरंगाबादला राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन व्हावे यासंदर्भात पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी खोडा घातला. आता राज्यात विदर्भाचे राज्यकर्ते प्रबळ ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरला विधि विद्यापीठ स्थापन करून मराठवाड्यावर अन्याय केला जात असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत जूनपासून औरंगाबादला विधि विद्यापीठ सुरू होणार नाही, हे आता स्पष्ट होत आहे. चौकट.. मराठवाड्याची केवळ उपेक्षाचराज्य मंत्रिमंडळाने नागपूर आणि औरंगाबादच्या विधि विद्यापीठाच्या कुलपतींचा प्रस्ताव एकत्र पाठवायला हवा होता. तो एकत्रितपणे पाठविला असेल, तर मग केवळ नागपूर विधि विद्यापीठासाठी कुलपती नियुक्त होतात आणि औरंगाबादसाठी होत नाहीत, याचा अर्थ विदर्भही मराठवाड्यावर अन्याय करीत आहे, असाच होतो, अशी प्रतिक्रिया विधि विद्यापीठासंबंधी पाठपुरावा करणारे अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी दिली. राज्य शासनाकडून मराठवाड्याची प्रत्येक बाबतीत कशी उपेक्षा होते याचे हे उदाहरण नागरिकांसमोर असल्याचेही ते म्हणाले.