शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

लातुरला ‘सभापती’पदाच्या घोषणेचे औचित्य

By admin | Updated: August 27, 2014 00:41 IST

आशपाक पठाण , लातूर पंचायत समिती सभापती पदांचे सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. लातूर पंचायत समितीचे सभापतीपद

आशपाक पठाण , लातूरपंचायत समिती सभापती पदांचे सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. लातूर पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचीत जातीसाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे बहुमत असलेल्या पंचायत समितीत भातांगळी गणातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव हे सध्या तरी एकमेव दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिला असल्याने पुन्हा महिलेला संधी मिळण्याची शक्यता धुसरच आहे. लातूर पंचायत समितीत १८ पैकी १६ सदस्य हे काँग्रेसचे आहेत. तर दोघे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. अनुसूचीत जातीच्या प्रवर्गातून चार सदस्य निवडून आले आहेत. गाधवड गणातून मनीषा श्रीमंत गायकवाड, कव्हा गणातून दीपमाला नेताजी मस्के, भातांगळी गणातून रावसाहेब सुदाम भालेराव व बोरगाव गणातून राष्ट्रवादीचे अंकुश भानुदास कांबळे हे निवडून आले आहेत. काँग्रेसचे बहुमत असल्याने रावसाहेब भालेराव यांचीच सभापतीपदी वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. शांत, संयमी स्वभाव असलेल्या भालेरावांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महिला सभापती असल्या तरी अनुसूचीत जातीसाठी सभापतीपद राखीव झाल्याने मनीषा गायकवाड व दीपमाला मस्के यांच्यापैकी एकास संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर महिन्यात सभापतींचा कार्यकाल संपणार असल्याने सभापती व उपसभापती पदांच्या निवडी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. इच्छुकांनी सभापती व उपसभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या लातूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या नावावर बाभळगावातूनच शिक्कामोर्तब होणार आहे़ उपसभापतीसाठी मात्र इच्छुकांमध्ये रस्सीखेच होईल़लातूर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीत दरवेळी पूर्व-पश्चिम भागाला समान संधी देण्याचा प्रयत्न राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ़ वैजनाथ शिंदे यांनी केला आहे़ पूर्व भागातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव यांची सभापतीपदी वर्णी लागल्यास उपसभापतीपद हे पश्चिम भागाला देण्यात येईल़ पश्चिम भागातून वांजरखेडा गणातून निवडून आलेले अ‍ॅड़ लक्ष्मण पाटील हे उपसभापतीपदासाठी इच्छुक आहेत़ पूर्व-पश्चिम भागाचा विचार झाल्यावर लक्ष्मण पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे़ शहरी व ग्रामीण असा निकष लावल्यावर बाभळगाव गणातील जहांगीर सय्यद यांना उपसभापतीपद दिले जाईल़ अ‍ॅड़ लक्ष्मण पाटील, जहांगीर सय्यद व बाळासाहेब कदम, व्यंकटराव पाटील यांच्यात रस्सीखेच होणार आहे़