शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लातुरकर म्हणतात भाजपचाच अडथळा!

By admin | Updated: November 12, 2014 00:26 IST

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले असून, बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला हे शासन सामोरे जात आहे़

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले असून, बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला हे शासन सामोरे जात आहे़ दरम्यान, राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा की, शिवसेनेला सहभागी करावे असा पेच निर्माण झाला आहे़ त्या अनुषंगाने सर्व्हेक्षणाद्वारे लातूर शहरातील शंभर नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले असता, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही़ शिवाय हा पाठिंबा अयोग्य असून, भाजप सेनेच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे़ त्यामुळे सेनेला शासनात सहभागी करुन घ्यावे, असे मत नोंदविले आहे़ सध्यातरी या भूमिकेला भाजपकडून अडथळा होत असल्याचे मत नागरिकांनी सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे़ ७१ टक्के लोकांनी भाजपकडून अडथळा होत असल्याचे म्हटले असून, २९ टक्के लोकांनी सेना जबाबदार असल्याचे म्हटले आहे़ तर ७७ टक्के लोकांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला विरोध दर्शविला आहे़ केवळ २३ टक्के लोकांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास समर्थन दिले आहे़भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासूनची युती होती़ ही युती नैसर्गिक आहे़ शिवाय विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने या दोन्ही पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे़ पहिल्या दोन सर्वाधिक संख्याबळ असलेल्या या दोनच पार्ट्या आहेत़ त्यामुळे या दोन्ही पक्षाचे मिळून सरकार स्थापन व्हावे, असे मत ७६ टक्के लोकांचे आहे़ केवळ २४ टक्के लोकांनी भाजप सेनेचे सरकार होऊ नये असे मत नोंदविले आहे़ सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने दोन्हीही पक्षाकडून बोलणी सुरु आहे़ परंतु त्यात सर्वाधिक अडथळा भाजपकडून होत असल्याचे सर्व्हेक्षणात व्यक्त झालेले मत आहे़ ७१ टक्के लोक भाजपाची भूमिका युती होण्यास अडथळ्याची ठरत असल्याचे म्हटले आहे़ तर २९ टक्के लोकांनी नैसर्गिक युतीला सेनेकडून अडथळा येत असल्याचे म्हटले आहे़अल्प मतातील सरकार बहुमतात येण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेणे योग्य नसल्याचे मत ७७ टक्के लोकांनी नोंदविले आहे़ केवळ २३ टक्के लोकांनी पाठिंबा घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे़ तरीही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यास सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही़ मध्यंतरीच हे सरकार कोसळेल, असे लातुरकरांना वाटते़ १०० पैकी ७३ टक्के लोकांना सरकार टिकणार नाही असे वाटत आहे़ केवळ ८ टक्के लोकांनी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे़ तर १९ टक्के लोकांनी या बाबत काही सांगता येत नाही असे म्हटले आहे़ लातुरकरांना सेनेने शासनामध्ये सहभागी व्हावे, असे वाटते़ ६९ टक्के लोकांनी शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्यापेक्षा सत्ताधारी बाकावर बसावे असे म्हटले आहे़ केवळ ३१ टक्के लोकांनी आता नाही, सेनेने विरोधी बाकावरच बसून विरोधकाची भूमिका वटवावी, असे मत नोंदविले आहे़ ३१ टक्के लोकांनी भाजपा सोबत राहू नये असे मत नोंदविले आहे़निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका युती करण्याबाबत सकारात्मक राहिली आहे़ परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वतंत्र लढण्याचीच होती़ त्यामुळे नैसर्गिक युतीला अडथळा आला़ सरकार बनवितानाही शिवसेनेने दोन पाऊले मागे टाकले आहेत, परंतु भाजपाची भूमिका सकारात्मक नाही़ त्यामुळे युतीचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मत सर्व्हेक्षणात लोकांनी व्यक्त केले आहे़ एकंदर शिवसेनेच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये सहानुभूती असल्याचे या सर्व्हेक्षणातून निदर्शनास आले आहे़भाजपाचे सरकार आरुढ झाले आहे़ शिवसेना सत्तेत जाणार की विरोधात बसणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही़ रोखठोक भूमिका घेऊन सेनेने आता स्पष्ट भूमिका घ्यायला हवी, अशी मतेही सर्व्हेक्षणातून पुढे आली आहेत़