लातूर : यशवंत पंचायतराज अभियानाचा लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. रविवारी राज्यपाल व ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्ष, पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यशवंत पंचायतराज अभियानात लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार, लातूर पंचायत समितीला विभाग स्तरावरील तृतीय आणि पंचायत समिती अहमदपूरला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. या तिन्ही संस्थांतील अध्यक्ष, सभापती व अधिकाऱ्यांनी मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारला. लातूर जि.प.च्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, आ. विनायकराव पाटील माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, कृषी सभापती कल्याण पाटील, समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, बांधकाम सभापती सपना घुगे, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, शाम पटवारी, ए.आर. मौजम यांनी पुरस्कार स्वीकारला.
लातूर जि.प.ला ‘पंचायत राज’चा द्वितीय पुरस्कार
By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST