शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

जलयुक्त शिवार अभियानाचा लातूर पॅटर्न

By admin | Updated: May 21, 2015 00:30 IST

हणमंत गायकवाड , लातूर शाश्वत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लातूर जिल्ह्यातील २०२ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, आतापर्यंत दोनशे कि.मी. अंतराचे नाला खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे.

हणमंत गायकवाड , लातूरशाश्वत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लातूर जिल्ह्यातील २०२ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, आतापर्यंत दोनशे कि.मी. अंतराचे नाला खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. २२४६ कामांपैकी १५०६ कामे पूर्ण झाली असून, दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेतल्याने आणि प्रत्यक्ष कामावर भेटी दिल्याने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाचा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण होत आहे. शासकीय यंत्रसामुग्री व विविध विभागांचा निधी, लोकप्रतिनिधींची भरघोस मदत आणि जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने जलयुक्त शिवार अभियानाने गती घेतली आहे.जिल्ह्यातील २०२ गावांत शिवार फेरी, काम कृती आराखडा, ग्रामसभा झाल्या असून, प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतर अगदी तीन महिन्यांमध्ये २२४६ कामांपैकी १५०६ कामे पूर्ण झाली आहेत. मे अखेर ७५६ कामे पूर्ण केली जाणार आहेत. या सर्व कामांचा आढावा दर आठवड्याला सोमवारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला जातो. स्वत: जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बहुतांश गावांतील कामांची पाहणी केली आहे. १११ प्रकल्पांतील ५१ लाख ७४ हजार ८३५ घनमीटर गाळ लोकसहभागातून उपसला असून, शासकीय यंत्रणेद्वारे ३ लाख ३३ हजार ८९ घनमीटर नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. नाला बल्डींग २६, माती नाला बांध ४, सिमेंट बंधारे २, विहिरींचे पुनर्भरण ४६, ठिबक सिंचन १४०० असे एकूण १५०६ कामे पूर्ण झाली आहेत. यांत्रिकी विभागाच्या वतीने ६० कामे पूर्ण झाली आहेत. यातील बहुतांश कामाला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी भेट दिली आहे. नवीन साखळी सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर, साठवण तलावाचे खोलीकरण आदी कामांचा यात समावेश आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला जनता, संस्था, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. या अभियानासाठी लोकांचा सहभाग वाढविण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ४लघुसिंचन विभागामार्फत सरळीकरण व खोलीकरण कामासाठी लोकसहभागातून १२९.५४ लाखांचा निधी मिळाला आहे. लोकप्रतिनिधींनीही भरघोस निधी या अभियानासाठी दिला आहे. खासदार संभाजी काकडे यांनी १ कोटीचा निधी लातूरच्या जलयुक्त शिवार अभियानाला दिला आहे. ४निलंगा (३० लाख), औसा (५६), लातूर शहर (१२), लातूर ग्रामीण (५), उदगीर विधानसभा (१० लाख) मतदारसंघातील आमदारांनी तसेच जिल्ह्याच्या खासदारांनी ६९ लाखांचा निधी जलयुक्त शिवारासाठी दिल्याने कामांना वेग आला आहे. २६ जानेवारीला जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या १४३ कामांचा एकाच दिवशी एकाचवेळी शुभारंभ करण्यात आला. ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. काही पूर्णही झाली आहेत. कृषी विभागाचे ७८, लघुसिंचनची १५ आणि जिल्हा परिषदेची ५० अशा एकूण १४३ कामांचे भूमिपूजन २६ जानेवारीला झाले होते. ही सर्व कामे आता शेवटच्या टप्प्यात आहेत. मे एण्डपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत. त्याचा दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात आहे.