शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

स्वच्छ शहराच्या यादीत लातूर शहर ३१८ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:20 IST

लातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील निकषाप्रमाणे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशातील ४३४ शहरांची निवड झाली असून, त्यामध्ये लातूर शहराने ३१८ वा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छता अभियान कालावधीत लातूर मनपाने सात हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले असून, त्याचा वापर सुरू झाल्याने शहर हागणदारीमुक्त झाले आहे.अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता, सततचा दुष्काळ, अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड देत मनपाने स्वच्छतेच्या निकषात आपले स्थान बऱ्यापैकी टिकविले आहे. मनपाकडे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग, तोकडा निधी आणि सातत्याने तीन वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत हे स्थान मनपाने पटकाविले. सद्यस्थितीत लातूर मनपामध्ये ४५० पदे रिक्त आहेत. मनपाला मिळणारे सहाय्यक अनुदानही बंद झाले आहे. तरीही मनपाने शहरातील नागरिकांच्या सहाय्याने स्वच्छतेत चांगली कामगिरी बजावली आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली असून, सात हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या गीताचे राज्यस्तरावर कौतुकही झाले आहे.