शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

स्वच्छ शहराच्या यादीत लातूर शहर ३१८ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:20 IST

लातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात देशातील एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील निकषाप्रमाणे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशातील ४३४ शहरांची निवड झाली असून, त्यामध्ये लातूर शहराने ३१८ वा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छता अभियान कालावधीत लातूर मनपाने सात हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले असून, त्याचा वापर सुरू झाल्याने शहर हागणदारीमुक्त झाले आहे.अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता, सततचा दुष्काळ, अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड देत मनपाने स्वच्छतेच्या निकषात आपले स्थान बऱ्यापैकी टिकविले आहे. मनपाकडे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग, तोकडा निधी आणि सातत्याने तीन वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत हे स्थान मनपाने पटकाविले. सद्यस्थितीत लातूर मनपामध्ये ४५० पदे रिक्त आहेत. मनपाला मिळणारे सहाय्यक अनुदानही बंद झाले आहे. तरीही मनपाने शहरातील नागरिकांच्या सहाय्याने स्वच्छतेत चांगली कामगिरी बजावली आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली असून, सात हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या गीताचे राज्यस्तरावर कौतुकही झाले आहे.