शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

लासुरगावच्या वेशीला डागडुजीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST

लासुरगावची वेस ही निजाम राजवटीत बांधली असल्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये उपलब्ध असलेल्या ५२ दरवाजांनंतर ग्रामीण भागात सुस्थितीत असलेले ...

लासुरगावची वेस ही निजाम राजवटीत बांधली असल्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये उपलब्ध असलेल्या ५२ दरवाजांनंतर ग्रामीण भागात सुस्थितीत असलेले परिसरातील हे एकमेव प्रवेशद्वार असल्याचे नागरिक सांगतात. हे प्रवेशद्वार सिमेंट विरहित दगडी बांधकामात बांधलेले आहे. यात चुना, गूळ, वाळूचे मिश्रण वापरलेले आहे.

ग्रामपंचायती अस्तित्वात आल्यानंतर या वेशीचे संवर्धन करण्यात आले. या प्रवेशद्वारावर नंतर थोडेसे विटांचे बांधकाम करून त्यावर ग्रामपंचायत कार्यालय स्थापन करण्यात आले. संपूर्ण गावचा कारभार या इमारतीतून चालवण्यात येत होता. लासुरगावचे प्रथम सरपंच स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय चांदमलजी वर्मा यांनी याच कार्यालयातून गावची धुरा सांभाळली. त्यानंतर कित्येक वर्षे ग्रामपंचायत येथेच होती.

ही वेस एखाद्या किल्ल्याचे प्रवेशद्वार वाटावे, अशी भव्य असून त्यात सुरक्षारक्षकांना बसण्यासाठी पडवीही तयार केलेली आहे. या वेशीला डागडुजीची आवश्यकता असून, यामुळे निश्चितच या वेशीचे आयुष्य वाढणार आहे. कोट...

मी आता नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे. माझे संपूर्ण आयुष्य लासुरगावात गेले. ही वेस शिवकाळात तयार केलेली असावी, असे आमचे वाडवडील सांगत होते. आजही ही वेस चांगल्या स्थितीत आहे.

-तात्याराव लहानू शेलार, लासुरगाव

फोटो :

250621\img_20210625_125728.jpg

तात्याराव लहानु शेलार लासुरगाव