शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

औरंगाबाद येथे प्रशासकीय संकुल निर्मितीची दोन वर्षांपासून फक्त चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:25 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी दोन वर्षांपासून फक्त चर्चा सुरू आहे. २०१६ मध्ये इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले नाही. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत ते प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमराठवाडा : मंत्रालयाच्या धर्तीवर सर्व शासकीय कार्यालयांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न; प्रकरण पुढे सरकेना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी दोन वर्षांपासून फक्त चर्चा सुरू आहे. २०१६ मध्ये इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले नाही. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत ते प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे.भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालय वगळता उर्वरित ४५ प्रशासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. त्या इमारती कार्यालयासाठी पोषक नाहीत; परंतु एकत्रित इमारत नसल्यामुळे पर्याय म्हणून ती कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त व इतर कार्यक्रमांमुळे कॅबिनेट मंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, आयुक्त, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुलात मंत्रालयीन दर्जाचे बैठक सभागृह, विश्रामगृह, सुसज्ज प्रशासकीय दालने, सर्व कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यासाठी संकुल उभारण्याचा विचार पुढे आला.१२ एकर जागा; ५० कोटींचा खर्चत्या प्रशासकीय संकुलासाठी १२ एकर जागा लागणार आहे. ५० कोटींच्या आसपासचा खर्च या संकुलावर होण्याची शक्यता आहे, त्या खर्चातही आता वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यायी जागा म्हणून लेबर कॉलनीतील जागेचा विचार सुरू झाला; परंतु त्या जागेच्या मालकीवरून वाद सुरू झाल्यानंतर ते प्रकरण थांबले. ३ वर्षांपर्यंतचा कालावधी ते संकुल बांधण्यासाठी लागणार आहेत, दोन वर्षे जागेसाठी वाट पाहण्यात गेले आहेत. महत्त्वाकांक्षी आणि औरंगाबाद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे ते भव्य संकुल असावे. यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्याचे कामही कासवगतीने सुरू आहे. या संकुलासाठी शासनाच्या मालकीच्या मिटमिटा, सातारा, लेबर कॉलनी परिसरातील काही जागा पर्याय म्हणून पुढे आल्या. लेबर कॉलनीतील जागा अंतिम झाली मात्र, तेथील भाडेकरु आणि शासन यांच्यात मालकीवरून वाद आहे.संकुलाची गरज कशासाठीप्रशासकीय कार्यालये सध्या शहरातील वेगवेगळ्या भागात विखुरलेली आहेत. बोटावर मोजण्याइतक्या कार्यालयांना स्वत:ची इमारत आहे.भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या शासकीय कार्यालयांना विद्यमान जागा पोषक नाही. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुल होणे महत्त्वाचे आहे. ४५ हून अधिक वेगवेगळी सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे त्यांचे एकत्रित संकुल असावे, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.विभागीय आयुक्त म्हणालेविभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर म्हणाले, लेबर कॉलनीच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत बांधकाम विभाग माहिती देऊ शकेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने माझ्याकडे अद्याप प्रशासकीय संकुल प्रकरणात काहीही माहिती दिलेली नाही.