शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

साडेबारा कोटी पाच वर्षांपासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:31 IST

परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यासाठी पाच वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीने दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी अजूनही पडून आहे. वळण रस्ता रद्द झाल्यानंतर हा निधी इतर कामांसाठी देणे अपेक्षित असताना तो अद्यापपर्यंत तसाच पडून ठेवल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यासाठी पाच वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीने दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी अजूनही पडून आहे. वळण रस्ता रद्द झाल्यानंतर हा निधी इतर कामांसाठी देणे अपेक्षित असताना तो अद्यापपर्यंत तसाच पडून ठेवल्याची बाब स्पष्ट झाली आहे.परभणी शहरातून जाणाºया राज्य मार्गाला शहराबाहेरुन साडे नऊ कि.मी.अंतराचा वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. हा वळण रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक होते. या भूसंपादनाला सुमारे ७० कोटी रुपयांची आवश्यकता होती. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हा रस्ता तयार केला जाणार होता. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०११-१२ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला होता. बांधकाम विभागाने कारेगाव, वांगी शिवार या भागात भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती. भूसंपादनासाठी जसाजसा निधी येईल, त्यानुसार भूसंपादन करण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीतून साडे बारा कोटी रुपये उपलब्ध झाले असले तरी उर्वरित सुमारे ५० कोटी रुपयांचा प्रश्न निर्माण झाला होता. या निधीसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणी केली. परंतु, हा वळण रस्त्याला शासन निधी देऊ शकत नाही, स्थानिक स्तरावरुन त्यासाठी प्रयत्न करावेत, असे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केला. त्यामुळे हा प्रश्न निधीअभावी रखडला होता.दरम्यानच्या काळात परभणी शहरातून जाणाºया राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यामुळे आता बाह्य वळण रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्वीचा साडे नऊ कि.मी.अंतराचा बाह्य वळण रस्ता रद्द करुन त्याही पुढे जावून साडे चौदा कि.मी.अंतराच्या वळण रस्त्याचा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे जुन्या वळण रस्त्याचे काम बंद पडले. या रस्त्यासाठी दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी वापरात आला नाही. तेव्हापासून हा निधी पडून आहे. दरम्यान, जिल्ह्यात निधी अभावी अनेक कामे रखडलेली असताना जिल्हा नियोजन समितीचा निधी पाच वर्षांपासून पडून असल्याने विकासकामांनाही ब्रेक लागला आहे. परभणी जिल्ह्यासाठी दिलेल्या या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी शासनाने तो इतर विकासकामांकरीता वळता करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.