शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा मोजताहेत शेवटच्या घटका

By admin | Updated: May 4, 2016 00:09 IST

शिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे.

शेतकरी हवालदिल : पाण्याअभावी फळबागा गेल्या वाळून; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षाशिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या बागांची अवस्था पाहून शेतकरी अत्यवस्थ झाला आहे. रोपांपासून जगवलेली फळझाडे उघड्या डोळ्यांनी मरणासन्न होत असल्याचे विदारक चित्र दुष्काळाने निर्माण केले आहे.उसाकडून कापसाकडे वळण घेतलेल्या शेतकऱ्याने दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि पैसा देणाऱ्या फळबागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. त्याला तितकाच जीव लावून रोपांचे भरणपोषण केले. पाणी मिळाले तर फळांचा बहर धरता आला असता; मात्र हे सारे दुष्काळाच्या आगीत होरपळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.सुरुवातीलाच पावसाने त्याची चाल दाखविल्याने पाणी कमी पडणार, याची जाणीव करून दिलेली असल्याने आहे ते पाणी किमान फळबागा जगविण्यासाठी जपून वापरले पाहिजे, त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला; मात्र विहिरीच कोरड्याठाक पडल्याने काही शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता टँकरचे पाणी देऊन झाडांना जोपासण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी उष्णतेचा तडाखा तीव्र असल्याने दोन तासांत पाणी देऊन भिजवलेली जागा वाळून जात असल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले.डाळिंब पीक फुलाला आले होते; मात्र फळधारणाची अपेक्षा ठेवल्यास झाडच वाळून जातील म्हणून फळाचा बहार धरलाच नाही. आता तर मे महिना, हा खरा परीक्षेचा कालावधी आहे. पहिल्याच दिवशी ‘मे’ने करामत दाखवली. उन्हात बागा जगतील, याची शाश्वती राहिली नाही.सर्वतोपरी बागा जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र आता पिण्यालाच पाणी नाही, तर चिकूच्या झाडांना काय घालणार? पाणीच नसल्याने दुष्काळी वणवा पाहावत नसल्याची खंत मल्हारी आघाव यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)फळबागांचे क्षेत्र ६१० वरून आले ३४५ वरतालुक्यात ६१० हेक्टर एवढे क्षेत्र फळबागांचे होते; मात्र सलग तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या अवर्षणाने ते घटत घटत आजमितीला निम्यावर म्हणजे ३४५ हेक्टरवर आले. यात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र १६५ हेक्टर असून, दीर्घकालीन चिंच ३२ हेक्टर, चिकू २३ हेक्टर, आंबा ७० हेक्टर, मोसंबी पाच हेक्टरवर, शिवाय उर्वरित क्षेत्रावर सीताफळ, कागदी लिंबू असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.