शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फळबागा मोजताहेत शेवटच्या घटका

By admin | Updated: May 4, 2016 00:09 IST

शिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे.

शेतकरी हवालदिल : पाण्याअभावी फळबागा गेल्या वाळून; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षाशिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या बागांची अवस्था पाहून शेतकरी अत्यवस्थ झाला आहे. रोपांपासून जगवलेली फळझाडे उघड्या डोळ्यांनी मरणासन्न होत असल्याचे विदारक चित्र दुष्काळाने निर्माण केले आहे.उसाकडून कापसाकडे वळण घेतलेल्या शेतकऱ्याने दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि पैसा देणाऱ्या फळबागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. त्याला तितकाच जीव लावून रोपांचे भरणपोषण केले. पाणी मिळाले तर फळांचा बहर धरता आला असता; मात्र हे सारे दुष्काळाच्या आगीत होरपळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.सुरुवातीलाच पावसाने त्याची चाल दाखविल्याने पाणी कमी पडणार, याची जाणीव करून दिलेली असल्याने आहे ते पाणी किमान फळबागा जगविण्यासाठी जपून वापरले पाहिजे, त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला; मात्र विहिरीच कोरड्याठाक पडल्याने काही शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता टँकरचे पाणी देऊन झाडांना जोपासण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी उष्णतेचा तडाखा तीव्र असल्याने दोन तासांत पाणी देऊन भिजवलेली जागा वाळून जात असल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले.डाळिंब पीक फुलाला आले होते; मात्र फळधारणाची अपेक्षा ठेवल्यास झाडच वाळून जातील म्हणून फळाचा बहार धरलाच नाही. आता तर मे महिना, हा खरा परीक्षेचा कालावधी आहे. पहिल्याच दिवशी ‘मे’ने करामत दाखवली. उन्हात बागा जगतील, याची शाश्वती राहिली नाही.सर्वतोपरी बागा जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र आता पिण्यालाच पाणी नाही, तर चिकूच्या झाडांना काय घालणार? पाणीच नसल्याने दुष्काळी वणवा पाहावत नसल्याची खंत मल्हारी आघाव यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)फळबागांचे क्षेत्र ६१० वरून आले ३४५ वरतालुक्यात ६१० हेक्टर एवढे क्षेत्र फळबागांचे होते; मात्र सलग तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या अवर्षणाने ते घटत घटत आजमितीला निम्यावर म्हणजे ३४५ हेक्टरवर आले. यात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र १६५ हेक्टर असून, दीर्घकालीन चिंच ३२ हेक्टर, चिकू २३ हेक्टर, आंबा ७० हेक्टर, मोसंबी पाच हेक्टरवर, शिवाय उर्वरित क्षेत्रावर सीताफळ, कागदी लिंबू असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.