शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

फळबागा मोजताहेत शेवटच्या घटका

By admin | Updated: May 4, 2016 00:09 IST

शिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे.

शेतकरी हवालदिल : पाण्याअभावी फळबागा गेल्या वाळून; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षाशिरूर कासार : महद्प्रयासाने लेकापेक्षा जास्त जीव लावून जोपासलेल्या फळबागांना पाण्याअभावी अखेरची घरघर लागली आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या बागांची अवस्था पाहून शेतकरी अत्यवस्थ झाला आहे. रोपांपासून जगवलेली फळझाडे उघड्या डोळ्यांनी मरणासन्न होत असल्याचे विदारक चित्र दुष्काळाने निर्माण केले आहे.उसाकडून कापसाकडे वळण घेतलेल्या शेतकऱ्याने दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि पैसा देणाऱ्या फळबागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. त्याला तितकाच जीव लावून रोपांचे भरणपोषण केले. पाणी मिळाले तर फळांचा बहर धरता आला असता; मात्र हे सारे दुष्काळाच्या आगीत होरपळून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.सुरुवातीलाच पावसाने त्याची चाल दाखविल्याने पाणी कमी पडणार, याची जाणीव करून दिलेली असल्याने आहे ते पाणी किमान फळबागा जगविण्यासाठी जपून वापरले पाहिजे, त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला; मात्र विहिरीच कोरड्याठाक पडल्याने काही शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता टँकरचे पाणी देऊन झाडांना जोपासण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी उष्णतेचा तडाखा तीव्र असल्याने दोन तासांत पाणी देऊन भिजवलेली जागा वाळून जात असल्याने शेतकऱ्यांनी हात टेकले.डाळिंब पीक फुलाला आले होते; मात्र फळधारणाची अपेक्षा ठेवल्यास झाडच वाळून जातील म्हणून फळाचा बहार धरलाच नाही. आता तर मे महिना, हा खरा परीक्षेचा कालावधी आहे. पहिल्याच दिवशी ‘मे’ने करामत दाखवली. उन्हात बागा जगतील, याची शाश्वती राहिली नाही.सर्वतोपरी बागा जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र आता पिण्यालाच पाणी नाही, तर चिकूच्या झाडांना काय घालणार? पाणीच नसल्याने दुष्काळी वणवा पाहावत नसल्याची खंत मल्हारी आघाव यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)फळबागांचे क्षेत्र ६१० वरून आले ३४५ वरतालुक्यात ६१० हेक्टर एवढे क्षेत्र फळबागांचे होते; मात्र सलग तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या अवर्षणाने ते घटत घटत आजमितीला निम्यावर म्हणजे ३४५ हेक्टरवर आले. यात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र १६५ हेक्टर असून, दीर्घकालीन चिंच ३२ हेक्टर, चिकू २३ हेक्टर, आंबा ७० हेक्टर, मोसंबी पाच हेक्टरवर, शिवाय उर्वरित क्षेत्रावर सीताफळ, कागदी लिंबू असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.