शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खरिपाच्या उत्पादनात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:56 IST

अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.जून २०१७ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. जुलै २०१७ च्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. १४ जुलै २०१७ नंतर झालेल्या पर्जन्यमानामुळे पीक परिस्थितीत सुधारणा झाली होती. २२ जुलै २०१७ ते १८ आॅगस्ट २०१७ या कालावधीत पावसाचा खंड, त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम झाला. १९ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती सुधारत आहे.मका पिकाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे उत्पादनात २० ते २२ टक्के घट अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, सोयगाव तालुक्यात पावसाच्या खंडामुळे ४० ते ५० टक्के उत्पादनात घट अपेक्षित आहे. सध्या मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.बाजरी पीकही दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे औरंगाबाद जिल्ह्यात २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. बीड जिल्ह्यातही बाजरीचे उत्पादन घटणार आहे. खरिपाची ज्वारी १९ आॅगस्ट २०१७ नंतर झालेल्या पावसामुळे सुधारत आहे. ज्वारी आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या व फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असून १९ आॅगस्टनंतरच्या पावसामुळे तूर पिकाची परिस्थिती सुधारत आहे. जालना जिल्ह्यात तुरीचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त राहील.मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट येणार आहे. सध्या मूग पीक काढणीच्या व मळणीच्या अवस्थेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड वगळता उत्पादनात ४० ते ५० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात १२२६ हेक्टर क्षेत्रातील मूग मोडावे लागले आहे. बीड जिल्ह्यात मूग पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे, अशीच गत उडीद पिकाची आहे. बीड जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत घट येण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यात ३९ हेक्टर क्षेत्रातील उडीद मोडावे लागले आहे. सिल्लोड वगळता औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादनामध्ये ४० ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. कापूस पिकाचेही उत्पादन घटणार आहे. पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. कापसाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात १५ ते २० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात २२०० हेक्टर क्षेत्रातील कापूस मोडावा लागला होता. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.