शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या उत्पादनात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:56 IST

अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.जून २०१७ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. जुलै २०१७ च्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. १४ जुलै २०१७ नंतर झालेल्या पर्जन्यमानामुळे पीक परिस्थितीत सुधारणा झाली होती. २२ जुलै २०१७ ते १८ आॅगस्ट २०१७ या कालावधीत पावसाचा खंड, त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम झाला. १९ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती सुधारत आहे.मका पिकाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे उत्पादनात २० ते २२ टक्के घट अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, सोयगाव तालुक्यात पावसाच्या खंडामुळे ४० ते ५० टक्के उत्पादनात घट अपेक्षित आहे. सध्या मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.बाजरी पीकही दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे औरंगाबाद जिल्ह्यात २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. बीड जिल्ह्यातही बाजरीचे उत्पादन घटणार आहे. खरिपाची ज्वारी १९ आॅगस्ट २०१७ नंतर झालेल्या पावसामुळे सुधारत आहे. ज्वारी आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या व फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असून १९ आॅगस्टनंतरच्या पावसामुळे तूर पिकाची परिस्थिती सुधारत आहे. जालना जिल्ह्यात तुरीचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त राहील.मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट येणार आहे. सध्या मूग पीक काढणीच्या व मळणीच्या अवस्थेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड वगळता उत्पादनात ४० ते ५० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात १२२६ हेक्टर क्षेत्रातील मूग मोडावे लागले आहे. बीड जिल्ह्यात मूग पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे, अशीच गत उडीद पिकाची आहे. बीड जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत घट येण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यात ३९ हेक्टर क्षेत्रातील उडीद मोडावे लागले आहे. सिल्लोड वगळता औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादनामध्ये ४० ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. कापूस पिकाचेही उत्पादन घटणार आहे. पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. कापसाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात १५ ते २० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात २२०० हेक्टर क्षेत्रातील कापूस मोडावा लागला होता. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.