शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खरिपाच्या उत्पादनात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:56 IST

अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनियमित पावसामुळे मराठवाड्यात खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असून, आता अपेक्षा रबीकडून व्यक्त होत आहे; पण यासाठीही चांगल्या पावसाची गरज राहणारच आहे.जून २०१७ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. जुलै २०१७ च्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. १४ जुलै २०१७ नंतर झालेल्या पर्जन्यमानामुळे पीक परिस्थितीत सुधारणा झाली होती. २२ जुलै २०१७ ते १८ आॅगस्ट २०१७ या कालावधीत पावसाचा खंड, त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम झाला. १९ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती सुधारत आहे.मका पिकाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे उत्पादनात २० ते २२ टक्के घट अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, सोयगाव तालुक्यात पावसाच्या खंडामुळे ४० ते ५० टक्के उत्पादनात घट अपेक्षित आहे. सध्या मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.बाजरी पीकही दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे औरंगाबाद जिल्ह्यात २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. बीड जिल्ह्यातही बाजरीचे उत्पादन घटणार आहे. खरिपाची ज्वारी १९ आॅगस्ट २०१७ नंतर झालेल्या पावसामुळे सुधारत आहे. ज्वारी आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या व फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असून १९ आॅगस्टनंतरच्या पावसामुळे तूर पिकाची परिस्थिती सुधारत आहे. जालना जिल्ह्यात तुरीचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त राहील.मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट येणार आहे. सध्या मूग पीक काढणीच्या व मळणीच्या अवस्थेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड वगळता उत्पादनात ४० ते ५० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात १२२६ हेक्टर क्षेत्रातील मूग मोडावे लागले आहे. बीड जिल्ह्यात मूग पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे, अशीच गत उडीद पिकाची आहे. बीड जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित आहे. जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत घट येण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यात ३९ हेक्टर क्षेत्रातील उडीद मोडावे लागले आहे. सिल्लोड वगळता औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादनामध्ये ४० ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. कापूस पिकाचेही उत्पादन घटणार आहे. पीक पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. कापसाच्या उत्पादनात औरंगाबाद जिल्ह्यात १५ ते २० टक्के घट अपेक्षित आहे. पैठण तालुक्यात २२०० हेक्टर क्षेत्रातील कापूस मोडावा लागला होता. पैठण, गंगापूर व सोयगाव तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.